गोंदिया : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत पुण्यातील भाजपाच्या सभेत अभद्र टिपणी केली. “उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहे,” असे अभद्र वक्तव्य अमित शाह यांनी केले. यामुळे शिवसेना (उबाठा) कार्यकर्ते चांगलेच संतापले. अमित शाह यांच्या विरोधात आज सोमवार २२ जुलै रोजी गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. गृहमंत्री शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांनी माफी मागावी, अशीही मागणी गोंदिया जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी केली.

आंदोलनात शिवसेना गोंदिया जिल्हाप्रमुख पंकज एस. यादव, शहर प्रमुख राजेश कनौजिया, अशोक आरखेल, तालुका समन्वयक संजू शमशेरे, विधानसभा समन्वयक सुनील रोकड़े, युवासेना जिल्हा अधिकारी हरिश तुलसकर, उपजिल्हा अधिकारी विक्की बोमचर, युवासेना शहर अधिकारी राहुल ठाकुर, उपतालुका प्रमुख गंगाधर शुलाखे, आदी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सहभागी झाले होते.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Maharashtra Assembly Election , Konkan ,
विधानसभेतील पराभवानंतर कोकणात उद्धव ठाकरे गटाला गळती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
uddhav thackeray sharad pawar
उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

हेही वाचा >>>मोठी बातमी- आतड्याचा कर्करोगावर प्रभावी औषधाचा शोध…२१ दिवस उंदरावर…

इटियाडोह धरण, नवेगावबांध धरण ‘ओव्हरप्लो’ होण्याचे मार्गावर

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तलाव-बोड्या तुडुंब भरल्या आहेत. तालुक्याचे भूषण असलेले इटियाडोह धरण व नवेगावबांध जलाशयात पाण्याचा साठा वाढत असल्याने लवकरच ही दोन्ही जलाशये ‘ओव्हरफ्लो’ होण्याचे मार्गावर आहेत.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटियाडोह धरण आज २२ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ७८.४२ टक्के भरलेला होता. दरतासांनी पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. इटियाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी वाढत आहे. यामुळे लवकरच धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अर्जुनी मोरगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नवेगावबांध जलाशयातील पाण्याची पातळी वाढत असल्याने हा जलाशयही ओव्हरफ्लो होण्याचे मार्गावर आहे. यामुळे या जलाशयाजवळ राहणाऱ्या व या जलाशयात मासेमारी करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

Story img Loader