नागपूर : कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रघुजीनगर, सक्करदरा येथील जलतरण गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. ज्या पद्धतीने डागडूजीचे काम सुरू आहे ते बघता जलतरण तलाव पुन्हा कामगारांच्या उपयोगी कधी पडेल ते सांगणे कठीण आहे.सर्वसामान्यांचे कोणतेही प्रश्न असो शासन व प्रशासन स्वत:हून सोडवण्याची तसदी घेत नसल्याचे अनेक उदाहरण आहे. त्यास कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रघुजीनगर, सक्करदरा येथील जलतरण तलाव अपवाद ठरले असते तर नवलच. करोना काळात बंद करण्यात आलेल्या हे स्वीमिंग पूल डागडूजीच्या दिरंगाईमुळे बंद आहे. जलतरण तलावाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण, त्याची देखभाल, वापरासंबंधी निविदा काढण्यात आली नाही. कामगार कल्याण विभागाने रघुजीनगर येथील जलतरण तलाव हे कामगार आणि त्यांच्या पाल्यांसाठी नागपुरात एकमेव जलतरण तलाव आहे. तो देखील गेल्या पाच वर्षांपासून ओसाड पडलेला आहे. या जलतरण तलावावर उन्हाळ्याच्या सुटीत पोहणे शिकणाऱ्यांची मोठी गर्दी असते. आता मार्च महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपतील. त्यावेळी त्यांच्यासाठी पोहणे शिकण्याचा पर्याय उपलब्ध नसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात हा तलाव बंद करण्यात आला. तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने तेथील फिल्टर खराब झाले, टाईल्स तुटल्या, पाणी गढूळ झाले. टँकला गळती लागली. त्यानंतर जलतरण तलावात पाणी सोडणे बंद करण्यात आले. त्यामुळे या तलावाची दुरवस्था झाली. कामगारांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तलावाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली. या तलावावर दोन कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च झाली आहे. परंतु, अजूनही काम पूर्ण झाले नाही.एखाद्या मुलास जलतरण शिकण्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी किमान तीन वर्षे लागतात. गेल्या पाच वर्षांपासून रघुजीनगर येथील जलतरण तलाव बंद आहे. त्यामुळे जलतरणातील एक पिढी वाया गेली आहे. कामगारांचे मुले-मुली जलतरण शिकण्यापासून वंचित राहिले आहे.संजय बाटवे, तलतरण प्रशिक्षक.

गेल्या दहा वर्षांपासून माझी दोन्ही मुले कामगार जलतरण तलावावर नियमित सराव करायची. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपली चुणूक दाखवलेली आहे. परंतु, कामगार जलतरण तलाव बंद असल्याने मला पिपळा फाटा ते एनआयटी जलतरण तलावापर्यंत माझी दोन्ही मुले १० किलोमीटर सायकलने येथे सरावाकरिता येतात, मला ऑटोचा खर्च परवडत नाही. हा जलतरण तलाव लवकर सुरू करावा, अशी शासनाला विनंती आहे.श्याम चापले, पालक. करोना काळात बंद झालेले देशातील सर्व जलतरण तलाव सुरू झाले. परंतु, हे तलाव अद्यापही बंद आहेत. दोन कोटी रुपये तलावाच्या डागडूजीसाठी व एक लाख रुपये पाण्याची पातळी पाहण्यासाठी दिले जाते. तरी देखील तलाव सुरू केले आहे. अशाप्रकारे इतके वर्षे तलाव बंद ठेवण्यात आले. तलाव उभारण्याचा मूळ उद्देश्याला हरताळ फासला गेला आहे. ॲड. प्रवीण साळुंखे, सभासद, कामगार कल्याण केंद्र.