नागपूर : राज्यातील काही भागात पावसाने उसंत दिल्यामुळे विजेची मागणी पुन्हा वाढत आहे. बुधवारी (१८ सप्टेंबर) दुपारी २.३० वाजता राज्यात विजेची मागणी २३ हजार ६१८ मेगावाॅट नोंदवली गेली. ही मागणी १४ ऑगस्टला दुपारी २ वाजता २२ हजार ८६२ मेगावाॅटच्या जवळपास होती.

मध्यंतरी राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस पडत असल्याने विजेची मागणी घटली होती. परंतु आता बऱ्याच भागात पावसाने उसंती दिली आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढू लागली आहे. राज्यात ३० जुलैच्या दुपारी १.३० वाजता विजेची मागणी १९ हजार ८३२ मेगावॉट होती. ही मागणी १४ ऑगस्टला दुपारी २ वाजता २२ हजार ८६२ मेगावॉटपर्यंत वाढली. १८ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता राज्यात विजेची मागणी २३ हजार ६१८ मेगावाॅट नोंदवली गेली. पावसाच्या उसंतीने वातानुकूलित यंत्र, कुलर, पंखे, कृषी पंपासह विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने ही मागणी वाढली आहे.

Satej Patil
राज्यात तिसऱ्या आघाडीचे भवितव्य कठीण; सतेज पाटील
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Goshalas, Maharashtra, Goshalas subsidy,
राज्यातील १३५ गोशाळांना झाली मोठी मदत; जाणून घ्या, राज्य सरकारने किती गोशाळांना दिले अनुदान
vegetable prices increased in pune marathi news
पुणे: भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी
Marathwada, dams, water storage,
मराठवाडा वगळता राज्यातील धरणे काठोकाठ, सविस्तर वाचा राज्यातील विभागनिहाय पाणीसाठा
Nirbhaya Squad, Maharashtra, women’s safety, Nirbhaya Squads in Maharashtra Remain Largely Inactive, police commissionerates, Nagpur,
राज्यातील निर्भया पथक कागदावरच!
rain Pune, Pune rain news, Pune weather,
पुण्यात सरींवर सरी
rain Maharashtra, rain news, Maharashtra weather,
राज्यात पावसाचा जोर कमी होणार ? जाणून घ्या, गुजरातमध्ये मुसळधार आणि राज्यात उघडीप का ?

हे ही वाचा…नागपूरचा प्रकल्प गुजरातला जाणार हे वडेट्टीवार यांना कोणत्या सुत्रांनी सांगितले? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सवाल

बुधवारी राज्यात विजेची मागणी दुपारी २.३० वाजता २३ हजार ८१८ मेगावॉट होती. त्यापैकी २० हजार ३८५ मेगावॉट मागणी महावितरणची होती. मुंबईत विजेची मागणी ३ हजार २३३ मेगावाॅट नोंदवली गेली. एकूण मागणीच्या तुलनेत १५ हजार १५६ मेगावॉट विजेची निर्मिती राज्यात झाली. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ८ हजार ५८४ मेगावॉट वीज मिळाली. राज्यात सर्वाधिक ६ हजार २३० मेगावॉट वीजनिर्मिती महानिर्मितीकडून झाली. त्यात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ५ हजार ८५१ मेगावॉट, उरण गॅस प्रकल्पातील २७३ मेगावॉट, जलविद्युत प्रकल्पातील ७१ मेगावॉट, सौरऊर्जेच्या २६ मेगावाॅट वीजनिर्मितीचा समावेश होता. खासगी प्रकल्पांपैकी अदानीकडून २ हजार ७६१ मेगावॅट, जिंदलकडून ९७२ मेगावॅट, आयडियलकडून २३० मेगावॅट, रतन इंडियाकडून ६३३ मेगावॅट, एसडब्ल्यूपीजीएलकडून ३८५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली.

हे ही वाचा…Mpsc Exam Date 2024 : एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा कधी होणार? पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक

एप्रिल महिन्यात सर्वोच्च मागणीची नोंद

महावितरणकडून यंदाच्या उन्हाळ्यात १७ एप्रिल २०२४ रोजी सर्वाधिक २५ हजार ६८ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. तर २७ फेब्रुवारीला २५ हजार २३ मेगावाॅट, २७ मार्चला २५ हजार ३५ मेगावाॅट, १९ एप्रिलला २४ हजार ८०५ मेगावाॅट, २२ मे रोजी २४ हजार ६०४ मेगावाॅट, ३ जूनला २४ हजार ४४३ मेगावाॅट विजेची मागणी नोंदवली गेली. परंतु आता ही मागणी तेव्हाच्या तुलनेत कमी झाली आहे. परंतु पाऊस लांबल्यास ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता वीज क्षेत्रातील जाणकारांकडून वतर्वली जात आहे.