वर्धा : सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी घायकुतीस आला आहे. शेकडो एकर शेतात पाणी साचले असून प्रामुख्याने हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यास पावसाने झोडून काढले आहे. एकशे आठ गावांना मोठा फटका बसला. वीज पडून आतापर्यंत ७५ जनावरे दगावली असून त्यात देवळी तालुक्यातील ६५ मेंढ्यांचा समावेश आहे. तीनशे चार कुटुंब मुसळधार पडल्याने बाधित झाली आहेत. सर्वाधिक पिकाचे नुकसान आर्वी तालुक्याचे झाले आहे.

हेही वाचा – अमरावती : राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्‍य आता एका ‘क्लिक’वर

Buldhana, leopards, leopards caught Buldhana,
बुलढाणा : मानव-वन्यजीव संघर्ष; तब्बल पाच बिबट जेरबंद…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
heavy rain Gondia district,
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चार बळी, ६९ जणांना वाचवले
Due to ongoing rain in Gondia district since early morning administration warned of caution
भीषण! गोंदियात मुसळधार पावसाचा कहर; इमारत कोसळल्याने मायलेकाचा मृत्यू
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
heavy rain in Isapur dam area water level increased 7 gates opend alert issued
इसापूर धरणाचे सात दरवाजे उघडले; विदर्भ -मराठवाडा सीमेवरील गावांना सतर्कतेचा इशारा
Heavy rains in Buldhana district cause severe damage to crops
अतिवृष्टीचे थैमान… बुलढाणा जिल्ह्यात पिकांची अतोनात नासाडी; सुपीक शेती खरडून गेली
Heavy rain in Yavatmal many villages flooded and flood in Panganga river
यवतमाळात मुसळधार, अनेक गावांत पाणी शिरले; पैनगंगा नदीला पूर

संत्रा, पपई बाग गळून पडली. पन्नास पशू गोठे ध्वस्त झाले. खपरी येथे मुन, देठे, मीरा गायकवाड, मोहन भोयर यांचे संसार उघड्यावर आले आहेत. वडनेर बंभली या मार्गावरील लहान पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. तसेच बांबर्डा ते टेंभा मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. या पुलाची उंची वाढवावी म्हणून सातत्याने मागणी होत असते. आजही पावूस सुरूच असल्याने ग्रामीण भाग त्रस्त झाल्याचे चित्र आहे.