नागपूर : राज्यातून गेले अनेक दिवस बेपत्ता झालेला मान्सून आता पुन्हा परतला आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. तसेच, राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस होत आहे. राज्यातील नंदुरबार, वाशीम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

crisis of unseasonal rains is looming over state as the southwest monsoon almost returned from state
अवकाळी पावसाचे संकट! राज्यात येत्या २४ तासात…
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Weather experts predict the possibility of return of rain across the state pune news
बुधवारपासून राज्यभरात परतीचा पाऊस ? जाणून घ्या, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
chikungunya cases surge three times more in maharashtra
विश्लेषण : राज्यात यंदा चिकुनगुनियाचे रुग्ण तिपटीने का वाढले?
imd predict after above average rainfall severe cold weather in maharashtra
जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका
Chance of rain again for rain in Maharashtra state Nagpur
राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण! येत्या २४ तासात…
cyclonic condition in Chhattisgarh will bring heavy rainfall to North Madhya Maharashtra for two days
राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस जाणून घ्या, परतीचा पाऊस कधी सुरू होतो
Heavy rain Maharashtra, agricultural Maharashtra,
आठवडाभर राज्यात सर्वदूर दमदार सरी? ऐन सुगीत शेतीमाल मातीमोल होणार?

हेही वाचा – भारतात नामबदलाची परंपरा जुनीच, यापूर्वी राज्य आणि राजधान्यांचेही नामकरण

हेही वाचा – एमपीएससीकडून दोन महिन्यांतच मोठ्या परीक्षेचा निकाल जाहीर; उत्तीर्ण उमेदवारांनो आता…

आज विदर्भातील काही भागांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे अनेक भागांत उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी बहुतांश ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे.