बुलढाणा: समृद्धी महामार्गावर झालेल्या सर्वच अपघात व मृत्यूंसाठी सरकार जबाबदार आहे. या मृत्यूप्रकरणी राज्य शासनावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. या मार्गावर परिपूर्ण सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी शासनाला आणखी किती बळी हवे? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. येथे प्रसिद्धी माध्यमासोबत बोलताना तुपकर यांनी ही मागणी केली.

हेही वाचा – चंद्रपूर : दीक्षाभूमीवर अवतरली निळाई, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्याला सुरुवात

Aarey - BKC Underground Metro Inauguration,
आरे – बीकेसी भुयारी मेट्रो लोकार्पण : विरोधकांनी प्रकल्प रोखल्याने ‘मेट्रो ३’चा खर्च १४ हजार कोटींनी वाढला – पंतप्रधान मोदी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
Akshay Shinde Encounter
Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
Minister of State for Labour, EY, CA girl EY,
‘ईवाय’मधील ‘सीए’ तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Badlapur Harassment case Suspension of Thane Education Officers for evading case responsibility Mumbai news
बदलापूर अत्याचार प्रकरण: जबाबदारी झटकल्याने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?

हेही वाचा – ‘एफबी फ्रेंड’कडे विवाहित महिला गेली नांदायला अन…

तुपकर म्हणाले की, समृद्धी मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण सुविधा नव्हत्या. याउप्परही केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी घाई गडबडीत समृद्धीचे लोकार्पण करण्यात आले. आजवर शेकडोंच्या संख्येत बळी गेले, जायबंदी झालेत. १५ ऑक्टोबरला संभाजीनगरमध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला, १ जुलैला बुलढाण्यात २५ जणांचे बळी गेले, या महामार्गावर सुरक्षेच्या उपायोजना करणे गरजेचे आहे. रोम जळत असताना राजा जसा फिडल वाजवत बसला होता त्याच धर्तीवर समृद्धी महामार्गावर लोकांचे जीव जात आहे आणि राज्यकर्ते निष्क्रियपणे फक्त बघत आहे.