देवेश गोंडाणे

नागपूर : तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीतील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती गुणवत्ता यादीमध्ये पहिला आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने  केला आहे.

विद्यापीठातील निकालांची रखडपट्टी; नव्याने निकाल तयार करण्याची वेळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mumbai health department loksatta news
वैद्यकीय अधिकारी २४ वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत, अनेकजण पदोन्नतीशिवायच निवृत्त
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam : ‘एमपीएससी’ची ४० लाखांत प्रश्नपत्रिका प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
The quality of school students has deteriorated it is clear from the asar survey Mumbai news
शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच! ‘असर’च्या अहवालात शैक्षणिक अधोगतीचा पंचनामा
businessman attacked with sharp weapon over minor dispute near kasba ganapati temple
किरकोळ वादातून व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार; कसबा गणपती मंदिराजवळील घटना
Changes in the format of the NEET question paper
‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल

तलाठी भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात अनेक उमेदवारांना एकूण २०० गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ‘नॉर्मलायझेशन’नंतर गुणवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, तलाठी भरती प्रक्रियेत पेपर फुटीच्या घटना घडल्याचे उघड झाले होते. त्यात आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने स्पर्धा परीक्षेशी कोणताही संबंध नसलेला एक टॅक्सीचालक आणि एक गृहिणी यांना अनुक्रमे २०८ आणि १९८ गुण कसे मिळाले, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे. ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून ते टीसीएसमधील कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ‘एक्स’वरील संदेशाद्वारे केला आहे.तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला १९८ आणि बहिणीच्या पतीला २०८ गुण मिळाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : तलाठी परीक्षेतील ‘सामान्यीकरणा’चा वाद काय आहे? एकूण गुणांपेक्षा जास्तीचे गुण मिळतातच कसे?

‘टीसीएस’चा प्रतिक्रियेस नकार

या प्रकाराबद्दल प्रतिक्रियेसाठी टीसीएस कंपनीचे विभागीय विपणन प्रमुख दीपांकर बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘‘प्रसार माध्यमांना उत्तर देण्यास मी बांधील नाही, आम्ही फक्त परीक्षा घेणाऱ्या शासकीय विभागांना उत्तर देऊ शकतो,’’ असे  सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, शासन निर्णयात बॅनर्जी यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. याप्रकरणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती ठाणे जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या कर्मचाऱ्याच्या मदतीनेच हा प्रकार घडला आहे. गृहमंत्र्यांना पुरावेच हवे असतील तर ते आम्ही देतो. त्यांनी निष्पक्ष चौकशी करावी. – राहुल कवठेकर, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.

Story img Loader