नागपूर: राज्यात सोमवारी (४ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता विजेच्या मागणीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घट झाली. त्यामुळे भारनियमन झाले नाही. राज्यात सोमवारी दुपारी १२ वाजता महावितरणची एकूण विजेची मागणी २३ हजार १५० मेगावॉट होती. त्यानुसार वीज उपलब्ध झाल्याने राज्यात कुठेही भारनियमन झाले नाही. त्यामुळे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कुठेही भारनियमन झाले नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला.

हेही वाचा – घर दुर्घटनेत बाप-लेकीचा मृत्यू, ना मदत, ना सांत्वन,शासन ‘ त्यांच्या’ दारी गेलेच नाही

Laborers working under Mahatma Gandhi Rojgar Guarantee Yojana are in arrears of wages since two months
रोहयोतील कामाच्या मजुरीची दोन महिन्यांपासून प्रतिक्षा; केंद्रासह राज्य सरकारकडे रक्कम थकीत
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
Due to heavy rains production of custard apple in Maharashtra has decreased by up to 30 percent Pune news
अतिवृष्टीचा सीताफळाला फटका बसला? जाणून घ्या, जुलै महिन्यातील पावसामुळे काय झालं
gst council decides to form new gom for health insurance premium
विमा हप्त्यांवरील जीएसटी कपात लांबणीवर; बैठकीत व्यापक सहमती, नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री
Wardha, mobile phone theft, recovery, police, lost phones, cyber cell, investigation, stolen mobiles, mobile return event, CEIR portal, wardha news, latest news,
वर्धा : ३३ लाखांचे मोबाईल सापडले, मालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले…
The accused in the case of kidnapping and murder of a 12 year old boy from Wadala was arrested Mumbai news
वडाळ्यातील १२ वर्षांच्या मुलाच्या अपहरण व हत्याप्रकरणातील आरोपीला अटक
ministers given permission till august 30 for transfers within department ahead of poll
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांना ‘मोकळे रान’; बदल्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुभा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार…; वाचा, कुलपती कोणावर बरसले?

राज्यात १ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता महावितरणची विजेची मागणी २४ हजार ३०० मेगावॉट होती. तर मागणीच्या तुलनेत उपलब्ध विजेत ९०० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाल्याने सकाळी ६ ते ७.३० वाजेदरम्यान जी १ ते जी ३ गटातील फिडरवर आपत्कालीन भारनियमन केले गेले. तर २ सप्टेंबरला विजेची शिखर मागणी सकाळी ५.४० वाजता २३ हजार ७०० मेगावॉटवर खाली आली. त्यानंतरही मागणीच्या तुलनेत विजेच्या उपलब्धतेत १ हजार २०० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यात सकाळी ५.४० ते ७.१५ दरम्यान जी गटातील फिडरवर भारनियमन केले गेले. तर रविवारी आणि सोमवारी मात्र तुलनेत मागणीत किंचित घट झाली. महावितरणच्या मुंबईतील अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला.