चंद्रपूर : जन्माला येणाऱ्याला मृत्यू अटळ असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत समाजात जगताना सामाजिक दायित्व अनेक आहेत. मात्र, मृत्यूनंतरही सामाजिक दायित्वाच्या भावनेने समाजाला देणारे क्वचितच आढळतात. चिमूर तालुक्यातील साठगावच्या महिला उपसरपंचांनी पतीसह मृत्यूनंतर अवयव तथा देहदानाचा संकल्प केला. मरणानंतरही आम्ही जिंवत राहून जग पाहू असा निर्धार त्यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगात अनेकांची विविध व्याधी, अपघाताने शारीरिक हानी होऊन किडणी, लिव्हर, डोळे, हृदय तथा अन्य अवयव निकामी होतात. राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या अहवालानुसार योग्य वेळेवर अवयव न मिळाल्याने दररोज १७ तर वर्षातून ५ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात दरवर्षी ५ लाख रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असते. यापैकी योग्य वेळेवर लिव्हर न मिळाल्याने २ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या हृदय, यकृत, किडनी, स्वादुपिंड, कॅर्निया, फुफ्फुस, त्वचा, हाड आणि आतडे इत्यादी अवयवदानातून अनेक व्यक्तींचे प्राण वाचविता येतात.

हेही वाचा – सप्टेंबरमध्ये मुसळधार, ‘आता ऑक्टोबर हिट’साठी तयार रहा

हेही वाचा – Monsoon Update: मुंबईसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता, कोकणाला ऑरेंज अलर्ट

देहदान केल्यावर साधारणपणे दहा शिकाऊ डॉक्टरांचे प्रशिक्षण संशोधन अवलंबून असते. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून नेहमी सामाजिक कामात हिरहिरीने भाग घेणाऱ्या साठगाव येथील महिला उपसरंपच प्रिती प्रवीण दिडमुठे यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्धार केला. तशी माहिती पतीस दिली. पतीने यास आनंदाने सहमती देऊन स्वतःही देहदान करण्याचे ठरविले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resolution of female deputy sarpanch for organ donation and body donation with husband rsj 74 ssb