वाशीम : सध्या उन्हाळा सुरू आहे की पावसाळा, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. २ एप्रिल रोजी रात्री जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कधी मुसळधार, कधी गारपीट, कधी रिमझिम तर कधी विजेच्या कडकडटासह पावसाचा कहर सुरू आहे. मंगळवारी रात्री वाशीम, मानोरा, मालेगावसह बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे रुई गोस्ता येथील पूस नदीला पूर आला, तर अनेक भागातील छोट्यामोठ्या ओढ्या, नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वाशीम तालुक्यातील अनसिंग ग्रामीण रुग्णालय जलमय झाले होते.

Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
The Central Housing Department has asked for additional funds for private developers under the Pradhan Mantri Awas Yojana Mumbai news
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना जादा निधी? केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून विचारणा
Which schools in Wardha district have water that is dangerous to drink
धोकादायक! ‘या’ शाळांतील पाणी पिण्यास घातक, जीवावर बेतणार…
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
niv test reveals the root cause of rare guillain barre syndrome disorder
‘एनआयव्ही’च्या तपासणीतून अखेर दुर्मीळ ‘जीबीएस’ विकाराचे मूळ कारण उघड; कशामुळे धोका जाणून घ्या…
Birds were counted at Tansa and Modaksagar Lakes by International Wetland and Forest Department
तानसा अभयारण्यात पक्षी गणना, ७५ पक्ष्यांची नोंद
Rivers flooded washim
अनसिंग ग्रामीण रुग्णालय परिसरात साचलेले पाणी
व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा – उन्हाळ्यात कोरडी राहणारी पूर्णा नदी मुसळधारेमुळे तुडुंब! ग्रामस्थ सुखावले

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिके, लिंबू, आंबा, टमाटे आदी पिकांचे नुकसान होत आहे. प्रशासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. परंतु मदत कधी मिळेल, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. आज बुधवारीदेखील बहुतांश ठिकाणी ढग दाटून आलेले असून वातावरणात गारवा पसरला आहे.

Story img Loader