लोकसत्ता टीम

नागपूर: भारताचा खरा इतिहास समोर आणावा लागेल. ही काळाची गरज आहे. एक काळ होता की, भारत वसाहतवादी मानसिकतेचा गुलाम होता. त्यामुळे अयोध्येचा खरा इतिहासही सांगितला जात नव्हता. आमच्या शिक्षकांचे अयोध्येवरील संशोधन नाकारले जात होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. भारताचा खरा इतिहास लोकांना सांगा, त्यासाठी समोर या, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले.

Laxman Hake, OBC, OBC community,
कोणाला पाडायचे – विजयी करायचे ओबीसी समाजाचे ठरले – लक्ष्मण हाके
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
rohit pawar on raj thackreray vidarbha visit
Rohit Pawar : “तुम्ही महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते, फक्त…”; राज ठाकरेंबाबत नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
It will be decided on Friday whether Samarjitsinh Ghatge will join Sharadchandra Pawar NCP
समरजितसिंह घाटगे यांची भूमिका उद्या ठरणार

आणखी वाचा-‘त्या’ ट्विटमुळे अजित पवार ट्रोल, “शब्दांचे पक्के असणारे दादा तिकडे गेल्यापासून…”

नागपूर येथे अखिल भारतीय शैक्षिक महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपीय सोहळ्यात ते बोलत होते. होसबळे म्हणाले की, भारत आज बौद्धिक स्वातंत्र्याकडे जात आहे. त्यामुळे आता आम्हाला घाबरण्याची गरज नाही. वसाहतवादी मानसिकतेतून भारत बाहेर आला आहे. आता जगाला भारताचा खरा इतिहास माहिती होणे आवश्यक आहे. जग भारताकडे विश्वगुरू होण्याच्या अपेक्षेने बघतो आहे. शिक्षकांवर मोठी जबाबदारी आहे. देशाची एक पिढी ते घडवतात. त्यामुळे त्यांनी भारताचा खरा इतिहास सांगायला हवा असेही होसबळे म्हणाले.