अकोला : कृषी विभागाच्या योजनांसंदर्भात समाजमाध्यमांवर अफवांचे पीक आले आहे. ‘महाडिबीटी पाेर्टल’वर दोन ते तीन महिने अर्ज भरवण्याची व सोडत होणार नसल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. ती माहिती चुकीची असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची व सोडत १५ मेपर्यंत असल्याचे तसेच १५ मे नंतर जवळपास दोन ते तीन महिने ऑनलाईन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचा संदेश विविध समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

Digital Revolution in Indian Agriculture
विश्लेषण : कृषी क्षेत्रातही होणार डिजिटल क्रांती? काय आहेत केंद्र सरकारच्या योजना?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
thane municipal commissioner marathi news
ठाणे: अवजड वाहनांच्या नियमावलीचे काटेकोर पालन करा, महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
UPSC Preparation Social Justice UPSC Mains General Studies Paper Two
upscची तयारी: सामाजिक न्याय
Pointing out lack of coordination in development system Nitin Gadkari reprimanded officials
विकास यंत्रणातील असमन्वयाकडे लक्ष वेधत गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
hsc result
HSC Result : इयत्ता बारावीच्या निकालात आता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण समाविष्ट होणार? NCERT चा नवा प्रस्ताव काय?
loksatta coffee table book marathi news
गृहनिर्मितीच्या नव्या क्षितिजवाटांचा पुस्तकातून वेध
Navi Mumbai schools CCTV, Sakhi Savitri Committee,
नवी मुंबई : ४७ शाळा सीसीटीव्हीविना, सखी सावित्री तसेच विशाखा समितीबाबतही शाळांचे दुर्लक्ष

हेही वाचा – VIDEO: ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हा चित्रपट…”

‘महाडिबीटी पोर्टल’ संदर्भात अशा प्रकारचा कोणताही संदेश किंवा माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली नाही. ‘महाडिबीटी पोर्टल’ या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येते.

हेही वाचा – वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे, अवघ्या चार तासात..

शेतकरी योजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे. तसेच शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे.