राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलहामुळे राजीनामा सत्र सुरू झाले असून ग्रामीण जिल्हाध्यक्षांपाठोपाठ ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईक यांनीही जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.एका नियुक्तीमध्ये विश्वासात घेतले नाही, या कारणाने ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त्त सार्वजनिक होताच चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खळबळ उडाली. त्यांचा राजीनामा पाहून ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी प्रदेश महिला अध्यक्षाला राजीनामा पाठविला आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत कलह ; ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचा राजीनामा

Ajit Pawar statement on Ladki Bahin Scheme money
अपात्र ‘लाडक्या बहिणीं’चे पैसे परत घेणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
What Rahul Solapurkar Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेचं विश्वस्तपद सोडलं, शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरील माफीनाम्यानंतर राजीनामा
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
AAP
7 MLAs quit AAP ahead of Delhi Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर AAP ला खिंडार! सात आमदारांनी सोडला पक्ष
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?

विशेष म्हणजे, दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता एका जाहीर सभेत महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या भाषणामुळे शरद पवार प्रभावित झाले होते. त्यानंतर पवार यांनी बेबीताई यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. महिला वर्गात बेबीताई यांची चांगली पकड आहे. ग्रामीण भागात तळागाळापर्यंत त्यांनी पक्ष पोहचविला. आता अचानक त्यांनी राजीनामा दिल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.राष्ट्रवादीच्या बेबीताई उईके या सामान्य कुटंबातील आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यानी राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. पक्षासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या प्रामाणिक कार्याचे शरद पवार यांनी कौतुकही केले होते.

Story img Loader