लोकसत्ता टीम

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर बचत गटाच्या महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ४२ एकर खुल्या जागेवर हा मेळावा होणार असून २६ एकरवर सभा मंडप उभारला जात आहे. जवळपास दोन लाख महिला या मेळाव्यासाठी आणण्याचे सरकारी नियोजन सुरू आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज गुरुवारी येथील महसूल भवनात आढावा घेतला.

All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mahakumbh , ABVP ,
…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकुंभात स्नान करणारे पाहिले असते, एबीव्हीपीच्या नेत्याचे वादग्रस्त विधान
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप
First-ever conference on tribal diseases in Nagpur experts from 17 countries will participate
आदिवासींच्या आजारावर प्रथमच नागपुरात परिषद… १७ देशातील तज्ज्ञ…
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
waqf bill
‘वक्फ विधेयक’ आगामी अधिवेशनातच, येत्या दोन दिवसांत अहवालावर शिक्कामोर्तब
BJP-RSS coordination
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही संघाची मदत; पंतप्रधान मोदींनंतर भाजपाचे मंत्री RSS शी चर्चा करणार

कार्यक्रमाच्या तयारीसाठी प्रशासनाच्यावतीने विविध प्रकारच्या ३० समित्या तयार करण्यात आल्या आहे. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांची प्रवास, बैठक, पाणी व्यवस्था उत्तमपणे होणे आवश्यक आहे. परिसरात स्वच्छतागृह पुरेशा प्रमाणात उभारण्यात यावे. येथे येणाऱ्या महिलांच्या गर्दी व्यवस्थापनासह स्टेज, मंडप, वाहनतळ, सुरक्षा आदींचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. मेळावा उत्तमपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

आणखी वाचा-नागपुरात २१ दिवसांत १५ हत्याकांड! क्षुल्लक कारणावरून बापलेकाने युवकाला भोसकले

२६ एकरवर मंडप उभारणीच्या कामाला गती आली आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांसाठी बसेसची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यासाठी बसनिहाय समन्वयक व तालुका स्तरावर संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा जिल्ह्यात

२०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचे दावेदार असताना त्यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे शेतकऱ्यांसमवेत ‘चाय पे चर्चा’ करून शेतमालास हमीभाव देण्याची ग्वाही दिली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केळापूर येथे महिला मेळाव्यासाठी ते आले होते. आता तिसऱ्यांदा ते लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला मेळाव्यासाठी यवतमाळला येत आहे.

Story img Loader