नागपूर : शेतीच्या हिश्शे वाटणीवरून कुटुंबात होणारे वाद, त्याला लागणारे हिंसक वळण, न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे यावर तोडगा म्हणून परस्पर सामंजस्याने ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी महसूल खात्याने सूरू केलेली ‘सलोखा’ योजना गावपातळीवर सकारात्मक परिणाम घडवून आणताना दिसते.

गावपातळीवर शेतीमधील वहिवाटीसंदर्भात कुटुंबात पिढ्यानपिढ्या वाद सुरू आहे. महसूल विभागाकडे असंख्य तक्रारी दाखल असून सद्यपरिस्थिती बदलण्यासाठी, शेतकरी बांधव वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत होते.अनेकदा कौटुंबिक वादाला हिंसक वळणही लागते. हा वाद सामंजस्याने मिटावा, गावपातळीवर कुटुंबात सलोखा निर्माण व्हावा म्हणून महसूल विभागाने सलोखा योजना आणली. शेतजमिनीचा ताबा एका शेतकऱ्याकडे व अभिलेख दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावे असलेल्या प्रकरणी सहमतीने अदलाबदल करुन अभिलेख दुरुस्त केले जातात.

Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
UPSC ची तयारी : भारतातील घरगुती खर्च- अलीकडील काळातील कल
Murder of husband who is obstructing in immoral relationship
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर गजाआड, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव
bike taking petrol fire
पेट्रोल भरताना बाईकचालकाच्या कोणत्या चुकीमुळे आग लागते? अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर
onion export duty marathi news
विश्लेषण: कांदा निर्यातीवरील शुल्क कमी होऊनही उत्पादक नाराज का?
article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

हेही वाचा – तरुणांनो सावधान! आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ व्हायरल, दगडफेक केली तर ‘या’ कलमांनुसार आयुष्यभर नोकरीची संधी मिळणार नाही

हेही वाचा – आला धोंड्याचा महिना! लेकी येणार माहेराला, जावाईबापू सोन्याने मढनार

या योजनेंतर्गत राज्यभरात पाच महिन्यांत १४९ दस्तांची नोंद झाल्याची माहिती महसूल खात्याने दिला. सर्वात जास्त ७६ एवढी दस्त नोंदणी अमरावती विभागात झाली असून यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर आहे. तर पुणे आणि ठाणे विभागात प्रत्येकी १७ एवढ्या दस्त नोंद झाली आहे. त्या खालोखाल नागपूर विभागात १२, नाशिक विभागात १०, औरंगाबाद विभागात ९, लातूर विभागात ८ एवढ्या दस्त नोंद झालेली आहे. राज्यात एकूण १४९ दस्त नोंद झाली असून योजनेतील सवलतीनुसार मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क असे अनुक्रमे १ लाख ४९ हजार २०० एवढे प्राप्त झाले. या योजनेअंतर्गत नोंद होणाऱ्या अदलाबदल दस्तावर मुद्रांक शुल्कासाठी १ हजार रुपये आणि नोंदणी शुल्क १ हजार रुपये अशी नाममात्र रक्कम ठेवण्यात आली आहे