वर्धा : सर्वात जास्त काळाबाजार चालणाऱ्या वाळूच्या व्यवहारास शिस्त लावणारे धोरण शासनाने मंजूर केले आहे. त्यानुसार शासनमान्य गोदामातून आता वाळू पुरविल्या जाणार आहे. पूर्वी लिलाव व्हायचे तेव्हा सर्वाधिक बोली लावणाऱ्यास शासन वाळू विकायचे. आता मात्र नेमके उलट झाले असून सर्वात कमी बोली लवणाऱ्यास वाळू मिळेल. आज त्यासाठी निविदा काढण्यात येणार असून बारा मेपर्यंत मुदत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक मे पासून या धोरणाचा अंमल होणार होता. पण राज्यात कुठेही तसे झालेले नाही. सहाशे रुपये ब्रास या दराने वाळू विकल्या जाणार आहे. सध्या काळ्या बाजारात हा दर सात ते आठ हजार रुपये एवढा आहे. या भावाने वाळू विकत घेत बांधकाम शक्य नसल्याने सामान्यांनी घराचे काम थांबविले आहे. शासन स्वस्त वाळू देणार म्हणून हे चातकासारखी वाट बघत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाळू उपसा हिंगणघाट तालुक्यात होतो. म्हणून इथे काळाबाजारही मोठ्या प्रमाणात चालतो.

हेही वाचा – अकोल्यात बायोगॅस, खत आणि वीज निर्मिती होणार; शहरातील ओल्या कचऱ्यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया, २० टन क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित

जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड म्हणाले की, निविदा प्रक्रिया प्रत्येक जिल्हानिहाय वेगळी आहे. निविदा प्रक्रिया आटोपल्यानंतर पुढील कार्यवाही होणार. बत्तीस वाळू घाट लिलाव पात्र असून त्यासाठी नऊ गोदाम तयार ठेवण्यात आले आहे. ऑनलाइन प्रक्रियेतून वाळू उपलब्ध करून दिली जाईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sand smuggling will be stopped government approved cheap sand shop will be opened pmd 64 ssb