लोकसत्ता टीम

नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात अधिवेशन काळ, मोर्चा, सामाजिक आंदोलन किंवा राजकीय आंदोलनादरम्यान कितीही पोलीस बंदोबस्त किंवा पोलिसांचे नियोजन असल्यानंतरही शहरात हमखास वाहतूक कोंडी निर्माण होते. नाकी नऊ येणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिक कंटाळले असून त्यावर अद्यापही तोडगा न निघणे हे पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलिसांचे अपयश असल्याचे दिसते.

flood situation alarming in north bengal centre not extending help says cm mamata banerjee
प. बंगालमधील पूरस्थिती चिंताजनक; केंद्र सरकार मदत करत नसल्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Will the traffic jam on the Pune-Bengaluru Bypass break 300 Crore fund approved in principle
पुणे-बेंगळुरू बाह्यवळणावरील वाहतूक कोंडी फुटणार? तीनशे कोटींच्या निधीला तत्त्वत: मंजुरी
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Taloja, industrial smart city, smart city,
तळोजाची औद्योगिक स्मार्ट सिटीकडे वाटचाल
municipal administration started temporary repairs on ghodbandar flyover and inspection of roads
ठाणे : कोंडीनंतर अधिकाऱ्यांना जाग, उड्डाणपुलांलगत तात्पुरती दुरूस्ती, रस्त्यांच्या पाहाणीला सुरूवात
action against vehicle owners
कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 

शहरात सार्वजनिक सुटी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी-दसरा यासह दुर्गोत्सव, नवरात्रोत्सव, गणपती विसर्जन, रॅली आणि मिरवणुकांमध्ये शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र असते. वाहतूक पोलिसांकडे योग्य नियोजन नसल्यामुळे शहराला वाहतूक कोंडीचा शाप लागलेला आहे. नोकरीवर जाताना किंवा कामावर पोहचण्याच्या गडबडीत असलेला नोकर-मजूर वर्ग वाहनाने निघत असतानाच अचानक रस्त्यावर राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटनांचे आंदोलन किंवा मिरवणुका असल्याने वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. सामान्य नागरिकांसाठी अशा संकटकालीन परिस्थितीला वाहतूक पोलीस जबाबदार असतात. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी लागणारा अभ्यास आणि अनुभव नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी हे नित्याचेच झाले आहे.

आणखी वाचा-ताडोबा ऑनलाईन बुकिंग घोटाळ्यातील आरोपी ठाकूर बंधूना सर्वोच्च न्यायालयाचाही दणका, अटकपूर्व जामिन फेटाळला…

शहरात वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून गर्दीच्य़ा ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. अरुंद रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर आम्ही तोडगा काढत आहोत. -जयेश भांडारकर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.

‘रस्ते अचानक बंद करू नका’

कोणत्याही प्रकारचा उत्सव असला की रस्त्यावर कार्यकर्ते किंवा समाजसेवकाच्या नावावर युवकांची टोळी उतरते आणि सर्वप्रथम रस्ता बंद करून वाहतूक थांबवले जाते. वाहतूक पोलीस किंवा पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे पालन होत नसल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. कायद्याचे पालन मिरवणुका किंवा राजकीय पक्षाच्या रॅली-आंदोलनादरम्यान होत नाही. राजकीय नेते वाहतूक नियम नेहमी पायदळी तुडवतात. परिणामतः शहरात विविध ठिकाणी किंवा अनेक चौकात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याचा सर्वाधिक त्रास होतो तो फक्त सामान्य नागरिकांना. त्यामुळे कोणत्याही उत्सवादरम्यान अचानक रस्ते का बंद केले जातात, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.