अमरावती : रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या बेवारस, दिव्यांग मुलांना पितृछत्र देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्यभर धडपड करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा वाढदिवस एरवी अत्यंत साधेपणाने वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृहात साजरा केला जातो. पण, त्यांचा ८४ वा वाढदिवस खास होणार होता. बालगृहातील मुले-मुली आपल्या बाबांच्या वाढदिवसाच्या तयारीत गुंतलेले असताना सकाळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा शंकरबाबांना फोन आला. अमित शहा यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. बेवारस, दिव्यांग मुला-मुलींच्या पुनवर्सनाचा कायदा व्हावा, या मागणीचा पुनरूच्चार शंकरबाबा यांनी चर्चेदरम्यान केला, त्यावर निश्चितपणे हा कायदा केला जाईल, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा