चंद्रशेखर बोबडे

केंद्रातील मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात (२०१५) घोषणा करण्यात आलेल्या स्मार्टसिटी योजनेतील स्मार्ट शहरे महाराष्ट्रात निवड झालेल्या आठपैकी एकाही शहरात आकार घेऊ शकली नाहीत. पुणे, सोलापूर या शहरांमध्ये या योजनेची प्रगती चांगली असली तरी इतर शहरात योजनेचा मोठा टप्पा शिल्लक आहे.

10 thousand vacant posts of Anganwadi workers and helpers will be filled
अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची १० हजार रिक्त पदे भरली जाणार
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
Nagpur, palm trees, ashoka trees ,
नागपूर : वर्दळीच्या रस्त्यावरील १५० पाम, ४१० अशोकाची झाडे तोडली
Joy of Community Farming
निसर्गलिपी : सामुदायिक शेतीचा आनंद
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण

हेही वाचा >>>वर्धा : लाजराबुजरा साळींदर रस्त्यावर उतरला, अन्…

केंद्र सरकारने २५ जून २०१५ मध्ये स्मार्टसिटी मिशन (एससीएम) योजना जाहीर केली होती. त्यासाठी जानेवारी २०१६ ते जून २०१८ या काळात स्पर्धात्मक फेऱ्यांद्वारे देशातून १०० शहरांची निवड करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील नागपूरसह औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर आणि ठाणे या आठ शहरांचा समावेश होता.

केंद्रीय नगर विकास खात्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील शहरांसाठी पाच वर्षात १८ हजार ३८५ कोटी रुपयांच्या (केंद्राचा हिस्सा २९४० कोटी) २९२ योजना सुरू करण्यात आल्या. त्यापैकी ७ हजार ५७५ कोटींच्या २१४ योजना पूर्ण झाल्या. ७८ योजना (किंमत १० हजार ९१० कोटी) अद्याप पूर्ण व्हायच्या आहेत.

हेही वाचा >>>कौतुकास्पद ! आंतरराष्ट्रीय अलामा अब्याकस स्पर्धेत चंद्रपूरचा स्पंदन मानकर जगात दुसरा

पुणे, सोलापूर या दोन शहराची कामे अंतिम टप्प्यात असली तरी इतर शहरांना अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे. नागपूर, कल्याण डोंबिवली या महापालिकांमध्ये स्मार्ट सिटी योजनेची स्थिती अत्यंत संथ आहे. नागपूरमध्ये भूसंपादन व अन्य कामामुळे काम थांबले आहे. योजनेला जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, या काळातही या योजना पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. करोनामध्ये गेलेली दोन वर्षे, भूसंपादन आणि अन्य कारणांमुळे नागपूरमध्ये या योजनेच्या कामाला फटका बसला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती
शहर योजना पूर्ण

नागपूर १८ ०५
औरंगाबाद ४२ ३१

कल्याण-डोंबीवली १८ ०८
नासिक ५० ३९

चिंचवड २५ १६
सोलापूर ४९ ४२

पुणे ४८ ४५
ठाणे ४२ २८

Story img Loader