नागपूर : निकामी सौर पॅनेलची अयोग्य विल्हेवाट आणि त्यांचा पुनर्वापर या मुद्द्यांवरून नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रावर ताशेरे ओढले. तसेच नोटीस बजावून त्यांना उत्तर द्यायला सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने वापरलेल्या सौर पॅनेलच्या योग्य विल्हेवाटीची कोणतीही सुविधा नसल्याचा दावा करीत राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) याचिका दाखल केली होती. या याचिकेची लवादाने दखल घेतली.

लवादाचे अध्यक्ष न्या. प्रकाश श्रीवास्तव आणि तज्ज्ञ सदस्य ए. सेंथिल वेल यांच्या खंडपीठासमोर २३ डिसेंबरला सुनावणी झाली. याचिकाकर्त्या शेतकऱ्याच्या उत्तर प्रदेशातील गावामध्ये २०१९पासून ‘कुसुम योजने’अंतर्गत सिंचनासाठी ऊर्जा निर्माण करण्याकरिता सौर पॅनेलचा वापर केला जात आहे. हे सौर पॅनेल निकामी झाल्यानंतर त्यांच्या विल्हेवाटीची कोणतीही व्यवस्था नाही अशी तक्रार याचिकाकर्त्याने केली आहे. सुनावणीदरम्यान लवादाने सौर पॅनेलच्या व्यवस्थापनातील त्रुटी अधोरेखित केल्या. या सौर पॅनेलची दुरुस्ती करणे शक्य नाही, त्याची भंगार म्हणून विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मात्र, ते नेमके टाकायचे कुठे, याबाबत कोणतीही व्यवस्था नाही. कारण, हे सौर पॅनेल जमिनीत गाडले तर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊन मातीची गुणवत्ता ढासळते, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. त्याबरोबरच मर्यादित ‘भंगार मूल्य’ असलेल्या पॅनेलसह विविध मुद्देही उपस्थित करण्यात आले आहेत.

article on cheaper electricity in loksatta pahili baaju
विजेचे अनाकलनीय गणित
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Solar pumps of Sahaj and Rotosolar companies shut down in two days after installation
सहज व रोटोसोलर कंपन्याचे सौर पंप बसविल्यानंतर दोन दिवसांत बंद, शेतकऱ्यांची पिके जळाली
Deonar waste land for Dharavi project Revenue Department requests Municipal Commissioner to provide land
देवनार कचराभूमीची जमीन धारावी प्रकल्पाला; जमीन देण्याची महसूल विभागाची पालिका आयुक्तांना विनंती
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
When will the dust settle on the Shivaji Park grounds
शिवाजी पार्क मैदानातील मातीचा धुरळा कधी खाली बसणार?
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!

हेही वाचा : स्वामी तिन्ही जगाचा… आईला निरोप देताना नाना पटोले ढसाढसा रडले…

लवादाने या प्रकरणात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, तसेच नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवांना प्रतिवादी ठरवून त्यांच्यावर ताशेरे ओढले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल खात्याच्या लखनौ क्षेत्रीय कार्यालयाच्या सदस्य सचिवांवरही या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. पुढील सुनावणी १० फेब्रुवारीला होणार आहे.

विल्हेवाटीतील अडचणी

भंगार विक्रेते सौर पॅनेलचे केवळ अॅल्युमिनियम, तांबे आणि काचेचे घटक स्वीकारतात. त्याव्यतिरिक्त पॅनेलमध्ये शिसे आणि कॅडमियमसारखे जड धातू असतात. ते तसेच फेकून दिल्यास माती आणि पाण्यात मिसळू शकतात. त्यामुळे पर्यावरणाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. खराब झालेल्या सौर पॅनेलची सुरक्षित विल्हेवाट किंवा पुनर्वापरासाठी कोणतीही प्रस्थापित यंत्रणा नाही असे लवादाने नमूद केले.

Story img Loader