यवतमाळ : केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडाणी, अंबानींसारख्या मित्रांना जगातील श्रीमंतांच्या यादीत नेऊन बसविले तर दुसरीकडे देशातील शेतकऱ्यांना मात्र लाचार बनविले, अशी टीका काँग्रेसचे राज्य सरचिटणीस देवानंद पवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे आज गुरुवारी सोटा मोर्चा काढण्यात आला.

राज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने लाखो हेक्टर शेतातील पिके मातीमोल झाली आहेत. सरकार मात्र राज्यात एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगत आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात एक लाख २५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सत्ताधारी गांजा पिऊन नुकसानीची पाहणी करतात काय, असा प्रश्न देवानंद पवार यांनी उपस्थित केला.

crime branch police inspector shrihari bahirat along with two suspended in bribery case
गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यासह दोघे निलंबित, अटक न करण्यासाठी पाच लाखांची लाच
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Crowd in NCPA for Ratan Tatas funeral
रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी ‘एनसीपीए’मध्ये गर्दी
shinde shiv sena set up entire system required for modi rally in thane
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची छाप
prahar association protest in front of collectors office for various demands of disabled
नाशिक : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे आंदोलन
Kidnap of priest, ransom, Karnataka, loksatta news,
पाच कोटींच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह शिष्यांचे अपहरण, कर्नाटकातून तिघे अटकेत
anganwadi workers announce chakka jam protest on 1 october across maharashtra
राज्यातील अंगणवाडी सेविका १ ऑक्टोबरला करणार चक्का जाम
defaulters, water pipe connections thane,
ठाण्यात थकबाकीदारांच्या ६११ नळजोडण्या खंडीत, ३० मोटर पंप जप्त

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष यात्रा, जुन्या पेंशनसाठी मोर्चा एकाच दिवशी; १२ डिसेंबरला पोलिसांची कसोटी

अतिवृष्टीने कापूस, सोयाबिन, तुरीचे प्रचंड नुकसान झाले. सरकार मात्र पीक विमा कंपनीसोबत साटेलोटे करुन त्यांचे एजंट बनून मलिदा लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पवार यांनी केला. सरकारने फक्त ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. इकडे आपल्या राज्यात शेतकरी मरत असताना सत्ताधारी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. मंत्रालय, विधानभवन पुर्नविकास कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारी केली जात असताना दुसरीकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून कसे वंचित करता येईल, याचीही व्युहरचना आखली जात असल्याचा आरोप पवार यांनी केला.

हेही वाचा – राष्ट्रपती दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहेत कार्यक्रम?

यवतमाळ जिल्ह्यात हलाखीच्या परिस्थितीने शेतकरी आत्महत्या करीत आहे तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र आपल्या मुलाच्या हट्टापायी महागड्या गाड्यांचे प्रदर्शन भरविण्यात अधिक रस दाखवितात, ही दुदैवी बाब असल्याची टीकासुद्धा देवानंद पवार यांनी केली. हातात सोटे घेतलेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा दुपारी १ वाजता गिलाणी महाविद्यालयापासून निघून तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर, शैलेश इंगोले, अध्यक्ष घाटंजी तालुका काँग्रेस कमिटी, संजय डंभारे अध्यक्ष घाटंजी तालुका किसान काँग्रेस, प्रा. विठ्ठल आडे यांच्यासह हजारोंच्या संख्येत शेतकरी सहभागी झाले होते. तहसीलदार शेलवटकर यांनी मोर्चास्थळी येऊन निवेदन स्वीकारले.