बुलढाणा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ७ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून झालेल्या पेरण्या उलटण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे जुलैमध्येही २५० गावांतील पाणी टंचाईची तीव्रता कायम असल्याचे चित्र आहे.

दमदार पाऊस न झाल्याने सुमारे २९ हजार हेक्टरवरील झालेल्या पेरण्या धोक्यात आल्या आहे. या तुलनेत तब्बल ७ लक्ष हेक्टरवरील पेरण्या अजूनही रखडल्या आहेत. किमान ७० मिलिमीटर वा शेत जमिनीत ४ ते ५ इंच ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. यामुळे लाखो शेतकरी चिंताग्रस्त झाले असून दमदार पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. या परिणामी मूग, उडीद या पिकांच्या पेऱ्यात घट येणार आहे.

vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Excavation in Boisar East Violation of quarry rules in excavation Palghar news
बोईसर पूर्वेला बेसुमार उत्खनन; खोदकामात खदानी नियमांचे उल्लंघन
४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात

हेही वाचा – “मलाही दादांची ऑफर होती” आमदार शिंगणेंचा गौप्यस्फोट; ‘एमइटी’ च्या बैठकीलाही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती

टंचाईची तीव्रता कायम

जुलै महिना सुरू झाला असला तरी पाणी टंचाईची तीव्रता कायम असल्याचे गंभीर चित्र आहे. जिल्ह्यातील २२ गावांना २३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच २३० गावांतील लाखावर ग्रामस्थांची तहान २५७ अधिग्रहित खाजगी विहिरींद्वारे भागविली जात आहे. जुलै लागला तरीही पाऊस अपुराच आहे. ५ जुलै अखेर जिल्ह्यात सरासरी ५४ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला आहे.

Story img Loader