लोकसत्ता टीम

नागपूर : भाजपचे घोषणापत्र जाहीर करण्यात आले असले तरी संविधान बदलण्याचा कट हा त्यांच्या ४०० पारच्या घोषणेतून दिसतो. ते लोकांच्याही लक्षात आले आहे. त्या दृष्टीने लोकांमध्ये संभ्रम तयार करून आणि समजूत घालावी अशी वेळ भाजपवर आली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
Cecile Richards personality
व्यक्तिवेध : सीसिल रिचर्ड्स
NCPs MLA from Wai Makarand Jadhav appointed as Guardian Minister of Buldhana
बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दीक्षाभूमी येथे भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आणखी वाचा-नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचा आणि देशाला जे संविधान दिले आहे त्यासाठी त्यांच्यापुढे वंदन केले. आदेशाला संविधान किती महत्त्वाचा हे पदोपदी अनुभव यायला लागले आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचा संविधान बदलण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. संघाचा अजेंडा ते राबवत आहे. देशाचे पंतप्रधान म्हणून ज्या दिवशी निवड झाली होती त्यावेळी त्यांनी पहिले संसदेच्या पायरीला वंदन केले होते आणि त्यानंतर त्यांनी ती इमारतच बदलली. त्यामुळे  देशात आता तिसऱ्यांदा जर भाजपचे सरकार आले तर ते संविधान बदलतील अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

विदर्भात इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, सर्वच ठिकाणी महाविकास आघाडीच्या सभेला आणि प्रचार यात्रेला लोकांची गर्दी आहे  त्यामुळे विदर्भातील सर्वच्या सर्व जागा इंडिया आघाडीचा विजय होईल असेही पाटील म्हणाले. विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नाच्या पलीकडे आता हातात काही राहिलेले नाही.त्यामुळे महायुतीकडून खोटे नाते आरोप होत असतील.

आणखी वाचा-सुखी संसाराला अहंकाराचे ग्रहण! आर्थिक सक्षम महिलांचा घटस्फोटाकडे कल

धैर्यशील पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे त्यासाठी मी आता अकलूज ला जाणार आहे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सर्वे समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे.त्याचा माढाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात परिणाम दिसेल. माढाचे समीकरण सकारात्मक होते. आता अधिक ताकद वाढेल आणि यशाची खात्री यानिमित्ताने होईल असेही पाटील म्हणाले.

Story img Loader