गडचिरोली: पुढच्या दहा वर्षात देशाला पहिल्या क्रमांकावर न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही यंदा ‘चारशे पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस नसून नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे केले. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार अशोक नेते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित मेळाव्याला फडणवीस यांनी संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांत २५ कोटी लोकांना दारिद्य रेषेच्या वर आणलं. ज्या देशात गरिबी आणि बेरोजगारी नसेल असा विकसित भारत मोदींना निर्माण करावयाचा आहे. मोदींचा १० वर्षाचा काळ हा ट्रेलर होता, पिक्चर बाकी आहे, असे सांगून फडणवीस यांनी येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा उद्योगात सर्वांत अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास व्यक्त केला.

Declining financial and government credibility
घसरण आर्थिक आणि सरकारच्या विश्वासार्हतेचीही!
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Sanjay Raut On BJP
Sanjay Raut : “लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस येतात”, संजय राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना मोठा इशारा
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा
Cecile Richards personality
व्यक्तिवेध : सीसिल रिचर्ड्स
challenge for new Guardian Minister Chandrashekhar Bawankule is to maintain goodwill of leaders of constituent parties in mahayuti
अमरावतीत पालकमंत्र्यांसमोर महायुतीतील घटकांना सांभाळण्याचे आव्हान

हेही वाचा >>>खामगाव ‘एमआयडीसी’मधील जगदंबा उद्योगाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ५५ वर्षे काँग्रेसचे आणि १० वर्षे मोदींचे अशी तुलना केल्यास मोदींची सत्ता देशाला विकसित भारताकडे घेऊन जाणारी ठरली. आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, पीक विमा योजना अशा अनेक योजनांचा लाभ कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे अशोक नेते यांना बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, अशोक नेते यांचेही भाषण झाले. मंचावर भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद पोरेड्डीवार, आ.कृष्णा गजबे, आ.डॉ.देवराव होळी, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, लोकसभा प्रमुख किशन नागदेवे, बाबूराव कोहळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख हेमंत जंबेवार, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्रमोद पिपरे उपस्थित होते.

Story img Loader