नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तरी राजकारणात काहीही होऊ शकते. भाजपा हा मोठा भाऊ असला तरी २०२४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार होणार हे पक्के आहे. दादाच मुख्यमंत्री होणार आणि देवेंद्र फडणवीस तसे बोलले आहे. त्यानंतर काही विषयच नाही. ‘समझनेवाले को इशारा काफी है’, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली.

धर्मरावबाबा आत्राम नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री कोण होणार हे येणारा काळ ठरवेल. ज्याची संख्या अधिक त्याचा मुख्यमंत्री असे काही समीकरम आता राहिले नाही. २०२४ मध्ये दादा मुख्यमंत्री होणार असल्याचे आत्राम यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावे आणि प्रफुल पटेल यांचे तसे ठरले होते. त्यांनी हा जिल्हा मागून घेतला आहे. आम्हाला पक्षासोबत माहायुतीचे काम करायचे असल्याचे आत्राम म्हणाले.

Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी

हेही वाचा – कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे संकट; शेतकरी चिंतेत, हिरवे स्वप्न…

प्राधिकरणाच्या माध्यमातून औषधी खरेदी केले जाते. ई टेंडर प्रक्रिया प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाते. औषधांचा कुठेही तुटवडा नाही. गेल्या पाच-सहा दिवस सुट्टीचे दिवस होते. खाजगी रुग्णालयसुद्धा मोठ्या प्रमाणात बंद होते, त्यामुळे अचानकपणे नांदेडमध्ये सरकारी रुग्णालयात गंभीर रुग्णांची संख्या वाढली. त्यात कमी वजनाचे बाळ असल्याने ती घटना घडली असल्याचे आत्राम म्हणाले.

हेही वाचा – थंडीची चाहूल! अनेक राज्यांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; भारतीय हवामान खाते म्हणते…

भेसळच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. तशा अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे या चार महिन्यांत मोहीम राबवत असून त्यावर अंकुश लावण्यासाठी काम केले जाणार आहे. रेस्टॉरंट असो, मिठाईची दुकाने असो त्या त्या भागात जाऊन कारवाई केली जाणार आहे. विदर्भ हा सुपारीचा हब आहे. आतापर्यंत २ कोटी २४ लाखांची सुपारी जप्त केली आहे. चंद्रपूर आणि नागपुरात ही कारवाई झालेली आहे.

Story img Loader