वाशीम : हवामान विभागाने वाशीम जिल्ह्यात वादळी पावसाचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. आज दुपारनंतर वादळी वारा व पावसाने जिल्ह्याला झोडपले. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाले.

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दुपारनंतर सुसाट वादळी वारा सुटला. मंगरुळपीर, वाशीम व इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे वाशीम तालुक्यातील सुरळा, कळंबा महालीसह काही गावांत घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. मालेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झाडांची तसेच घरांच्या भिंतींची पडझड झाली. वाशीम शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीतील शेतमाल भिजला. अचानक आलेल्या पावसामुळे इतर ठिकाणीदेखील नुकसान झाले.

Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
in pune one killed and one injured in rickshaw-dumper collision
पुणे : रिक्षा-डंपरच्या धडकेत एक ठार, एक जखमी
Despite spending crores Melghat faces water shortage this year too
कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके
177 crores stuck with developers of Pune customers
घरही मिळेना अन् पैसेही मिळेनात! पुण्यातील ग्राहकांचे विकासकांकडे १७७ कोटी अडकले
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…

हेही वाचा…बुलढाण्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा; पावणेदोन लाखांवर ग्रामस्थांची टँकरवर भिस्त

वीज पुरवठा खंडित

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. कधी विजांचा कडकडाट तर कधी वादळी वारा, अशी स्थिती आहे. या दरम्यान अल्पसा पाऊस असो वा वादळ वारा, वीज पुरवठा खंडित केला जातो. काही गावांत तर एकदा वीज गेली की कधी येईल, याची कुठलीच शास्वती नसते. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Story img Loader