लोकसत्ता टीम

नागपूर: दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या नागपूरकरांना सोमवारी सकाळी झालेल्या वादळी पावसामुळे दिलासा मिळाला. प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि तितकाच दमदार पाऊस यामुळे काही वेळातच रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे कार्यालयात जाण्यासाठी बाहेर पडलेल्या नोकरदारांर वर्गाची चांगलीच गैरसोय झाली.

African Giant Snail which is causing havoc all over the world was found in Brahmapuri
जगभरात तांडव माजवणारी ‘ती’ ब्रम्हपुरीत आढळली…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
MP Praniti Shinde says Opposition leader is our Chief Minister
चंद्रपूर : खासदार प्रणिती शिंदे म्हणतात, ‘विरोधी पक्ष नेता आमचा मुख्यमंत्री…’
Devendra Fadnavis On Manoj Jarange
Devendra Fadnavis : “…तर मी राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
tiger in the forest attacked on cowherd
चंद्रपूर : जंगलात दबा धरुन बसलेल्या वाघाचा गुराख्यावर हल्ला…
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
News About Sanjoy Roy What His Mother in Law Said?
Sanjoy Roy : “संजय रॉयला फाशी दिली तरीही आम्हाला काहीच..”, कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सासूची प्रतिक्रिया
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”

सोमवारी रक्षाबंधनाचा दिवस असल्याने सर्वत्र सकाळपासून सर्वत्र वर्दळ होती. रविवारीच हवामान खात्याने सोमवारी वादळी पाऊस येणार असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आकाशातही ढगांनी गर्दी केली होती. सकाळी १० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. सोबतीला जोराचा वाराही वाहात होता. त्यामुळे पावसाचा वेग आणि तीव्रता अधिक जाणवत होती. अवघ्या १०-१५ मिनिटाच्या पावसाने रस्त्यावर तळे साचले. विविध कामांसाठी सकाळी बाहेर पडलेल्या नागपूरकरांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.

आणखी वाचा-चंद्रपूर : जंगलात दबा धरुन बसलेल्या वाघाचा गुराख्यावर हल्ला…

दुसरीकडे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. अनेक शाळांना रक्षाबंधनची सुटी असल्याने पावसामुळे मुलांचा उडणारा गोंधळ टळला.

मुहूर्तानुसार रक्षाबंधनाची शुभवेळ दुपारनंतर आहे. त्यामुळे अनेक भगिनींनी भावाकडे जाण्यासाठी दुपारनंतर बेत आखला आहे. त्यावेळी पाऊस नसावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यंदा नागपुरात व जिल्ह्यात उत्तम पाऊस झाला असून धरणे भरली आहे. नागपूरला पाणी पुरवठा करणारे पेंच धरणही भरले असून उन्हाळ्यातील पावसाची चिंता मिटली आहे.