लोकसत्ता टीम

चंद्रपूर : सलग ४८ तास पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरले आहेत. अनेक नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. अशातच वरोरा तालुक्यातील कोसरसार-बोडखा या पुलावरून पाणी वाहत असताना विद्यार्थांना वरोरा या तालुक्याच्या ठिकाणी जीव मुठीत ठेवून पुरातून जीवघेणा प्रवास करीत एका हातात पायाची चप्पल, पाठीवर दप्तरं आणि दुसऱ्या हाताची साखळी करून विद्यार्थी पुरातून मार्ग काढीत शाळेतून घरी व घरून शाळेत जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ व छायाचित्र समाज माध्यमावर सार्वत्रिक होताच सर्वत्र लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनावर टीका होत आहे.

Attempted kidnapping of Birla College student in Kalyan
कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Shocking video of two female students did weird act in government school viral video on social media
अचानक वर्गातून उड्या मारल्या आणि मैदानात लोळू लागल्या, सरकारी शाळेत विद्यार्थीनींचं विचित्र कृत्य! VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
जगणं आकलनाच्या दिशेनं…
Dangerous transportation of students by vehicle continues in Vasai Possibility of accident
वसईत विद्यार्थ्यांची वाहनातून धोकादायक वाहतूक सुरूच; अपघाताची शक्यता
Students brave rope trolleys to reach school in Uttarakhand; viral video sparks outrage
खाली खळखळ वाहणारी नदी, एक दोरखंड अन् ट्रॉलीच्या भरोशावर….शाळकरी मुलींचा जीवघेणा प्रवास, Viral Video
Andhra College Student Jumps Off 3rd Floor
Viral Video : शिक्षकासमोरच वर्गातून उठून बाहेर गेला अन् गॅलरीतून मारली उडी; विद्यार्थ्याची ऑन कॅमेरा आत्महत्या
Girish Mahajan gets Nashik Guardian Minister post print politics news
गिरीश महाजन यांच्यासाठी कुंभमेळा आला धावून

सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे शाळेत जात असताना सर्व विद्यार्थी एका हातात पायाची चप्पल, पाठीवर दप्तरं आणि दुसऱ्या हाताची साखळी करून पुरातून मार्ग काढीत आहे. हे विध्यार्थी वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी गावातील आहेत. शिक्षणासाठी त्यांना वरोरा या तालुक्याच्या ठिकाणी दररोज जावं लागतं. जिल्हातील कोसरसार ते बोडखा मार्गावरील नदीवर जुना पूल आहे. या पुलावरूनच मागील पंचवीस वर्षांपासून बोडखा ग्रामस्थ ये जा करतात. पुल लहान असल्याने मोठा पाऊस आला की काही तासातच पुलावरून पाणी पाणी वाहू लागतंय. बोडखा मोकाशी गावाला ये जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने भर पुरातुन त्यांना मार्ग काढीत जावे लागते. येथील विद्यार्थी कोसरसार व वरोरा येथील शाळेत शिक्षण घेतात. पावसाळ्यात विध्यार्थ्यांना पुरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. या नदीवर नव्या पुलाची निर्माती करावी अशी मागणी वारंवार गावकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासन यांच्या जवळ केली आहे. मात्र त्यांचा मागणीकडे कुणीही गांभीर्याने बघितले नाही.

आणखी वाचा-आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये कलगीतुरा; ठाकरेंना तुरुंगात टाकण्याचा फडणवीसांचा डाव देशमुख

चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार दिवसापासून संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो घरांची पडझड तर हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. गेल्याच आठवड्यात नागभीड तालुक्यात पाचव्या वर्गात शिकणाऱ्या एका दहा वर्षीय विद्यार्थ्यांचा पुल पार करताना पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यु झाला. मुलाच्या मृत्युची घटना नुकतीच घडली असताना विद्यार्थ्यांचा असा व्हिडिओ समोर आल्याने जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर टीका होत आहे. पंचवीस वर्षांत एखाद्या भागात पुल होत नसेल तर असे लोकप्रतिनिधी काय कामाचे असाही प्रस्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान सलग ४८ तास पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी नाल्याना पूर आलेला आहे. इरई धरणाचे सात दरवाजे उघडले आल्याने नदी काठावरील वस्त्याना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर पाहायला जाणाऱ्या लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader