वाशिम : जिल्ह्यातील कोतवाल पदाच्या ८२ जागांसाठी १ हजार ९४५ अर्ज दाखल झाले होते. त्यासाठी रविवार ३० जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. व लगेच निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेवर आक्षेप घेतला आहे. नियमित अभ्यास करणारे व इतर परीक्षेत ७० टक्के गुण घेणाऱ्यांना कोतवाल परीक्षेत कमी गुण कसे, असा त्यांचा आरोप आहे.

महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ८२ कोतवाल पदासाठी रविवार ३० जुलै रोजी परीक्षा घेतली. परीक्षेला १ हजार ९४५ अर्ज आले होते. परीक्षा संपताच केवळ दोन तासांत निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल जाहीर होताच अनेक विद्यार्थ्यांना धक्काच बसला. नियमित अभ्यास करणारे व शासनाच्या विविध परीक्षेत ७० टक्के घेणाऱ्यांना कोतवाल परीक्षेत अत्यंत कमी गुण कसे मिळाले. तसेच जाहीर केलेले गुण व सोडविलेल्या गुणाची पडताळणी केली असता. त्यामध्ये तफावत झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

in chhattisgarh 8 people died including six student
परीक्षा देऊन घरी परतत असताना काळाचा घाला, अंगावर वीज कोसळल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू; छत्तीसगडमधील घटना
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
sharad pawar
शरद पवारांचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; सरकारला इशारा देत म्हणाले…
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
The Medical Education Department has decided to take action against colleges that charge admission fees Mumbai news
प्रवेशाच्या वेळी शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार; आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा
education department, Mumbai municipal corporation,
मुंबई : शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाची पळापळ
cet for admission to postgraduate engineering courses
पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी

हेही वाचा – “मुख्याधिकारी हटाव”साठी एकवटले यवतमाळकर; नगर पालिकेत लोकांनीच केली जनसुनावणी, समस्यांची शेकडो निवेदने

हेही वाचा – “संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही”; बावनकुळे म्हणाले, “महायुतीत आमच्या मंचावर ते येतील, त्यांच्या मंचावर..’

आज ३१ जुलै रोजी अनेक विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी गेले असता, त्यांनी मालेगाव तहसीलदार यांना भेटा, असे उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांत नाराजी व्यक्त केली जात असून नव्याने गुणाची तपासणी करावी, उत्तर पत्रिका तपासावी, तोपर्यंत सदर भरतीचा निकाल राखून ठेवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.