वाशिम : जिल्ह्यातील कोतवाल पदाच्या ८२ जागांसाठी १ हजार ९४५ अर्ज दाखल झाले होते. त्यासाठी रविवार ३० जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. व लगेच निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेवर आक्षेप घेतला आहे. नियमित अभ्यास करणारे व इतर परीक्षेत ७० टक्के गुण घेणाऱ्यांना कोतवाल परीक्षेत कमी गुण कसे, असा त्यांचा आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ८२ कोतवाल पदासाठी रविवार ३० जुलै रोजी परीक्षा घेतली. परीक्षेला १ हजार ९४५ अर्ज आले होते. परीक्षा संपताच केवळ दोन तासांत निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल जाहीर होताच अनेक विद्यार्थ्यांना धक्काच बसला. नियमित अभ्यास करणारे व शासनाच्या विविध परीक्षेत ७० टक्के घेणाऱ्यांना कोतवाल परीक्षेत अत्यंत कमी गुण कसे मिळाले. तसेच जाहीर केलेले गुण व सोडविलेल्या गुणाची पडताळणी केली असता. त्यामध्ये तफावत झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

हेही वाचा – “मुख्याधिकारी हटाव”साठी एकवटले यवतमाळकर; नगर पालिकेत लोकांनीच केली जनसुनावणी, समस्यांची शेकडो निवेदने

हेही वाचा – “संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही”; बावनकुळे म्हणाले, “महायुतीत आमच्या मंचावर ते येतील, त्यांच्या मंचावर..’

आज ३१ जुलै रोजी अनेक विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी गेले असता, त्यांनी मालेगाव तहसीलदार यांना भेटा, असे उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांत नाराजी व्यक्त केली जात असून नव्याने गुणाची तपासणी करावी, उत्तर पत्रिका तपासावी, तोपर्यंत सदर भरतीचा निकाल राखून ठेवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students protest against kotwal recruitment exam in washim district pbk 85 ssb
Show comments