खासदार संजय राऊत यांनी २०२४ च्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाची अवस्था ही ‘बेडका’प्रमाणे होईल, अशी टीका केली होती. यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना जोरदार टोला लगावला. संजय राऊत यांच्या मते ‘हरामखोर’ शब्दाचा अर्थ ‘नॉटी’ होतो. ते म्हणतात, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा. मग तुम्ही आपल्या मुलाला डॉक्टर करणार की कंपाऊंडर? अशांना गांभीर्याने घेऊ नका. महाराष्ट्र चालवणे काही ‘हास्य जत्रा’ नाही आणि त्यातही सात अजूबे इस दुनिया में… संजय राऊत हे जगातील आठवे अजूबे आहेत, असा मिष्किल टीका वनमंत्री मुनगंटीवार यांनी केली.

हेही वाचा- ऐकलं का? गोंदियाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवे पाहुणे येणार; वाचा कोण ते…

Gaurav Gogoi on Ranveer Allahbadia
Ranveer Allahbadia: “अशा लोकांना तुम्ही…”, रणवीर अलाहाबादियाचे एकेकाळी कौतुक करणाऱ्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस खासदाराचा सवाल
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
shahu Patole author of dalit Kitchen of maharashtra remarked bans on animal killings like cows and potentially donkeys wouldnt be surprising in future
भविष्यात पशु-पक्ष्यांच्या हत्येवरही बंदी आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे का म्हणाले लेखक शाहू पाटोळे
राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
dilip kumar
दिलीप कुमार झोपलेले असताना धर्मेंद्र त्यांच्या घरात घुसले होते; अभिनेते म्हणालेले, “मी घाबरत जिना उतरला अन्…”
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”

यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. भाजपा हा सडक्या विचाराचा पक्ष आहे, असे पटोले म्हणतात. पण, भाजपा हा सडक्या नाही तर मूल्यवान विचाराचा पक्ष आहे. पटोले यांनी आपल्या काँग्रेस पक्षाबद्दल बोलावे त्यांनी भाजपाला सडक्या विचाराचा पक्ष म्हणून दाखवून दिले की त्यांचा मेंदू कोणत्या विचाराचा आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीची चौकशी व्हावी, अशी मागणी सभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, जीव कुणाचाही असो महत्त्वाचाच आहे. मोठ्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून नाही तर सर्वसामन्यांच्याही वाहनावर किंवा त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.

Story img Loader