चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सोमनाथ सफारी प्रवेशद्वाराच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे, या नव्या प्रवेशद्वाराच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केले.

मूल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान येथे सोमनाथ सफारी पर्यटन प्रवेशद्वाराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रवेशद्वाराचा शुभारंभ करण्यात आला.

basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
Uttarakhand UCC portal marriage registrations
Uttarakhand UCC: समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये विवाह नोंदणी कशापद्धतीने सुरू आहे?
Important decisions taken after discussions between Foreign Secretaries of India and China regarding Kailash Mansarovar Yatra
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू; भारत, चीनच्या परराष्ट्र सचिवांच्या चर्चेनंतर महत्त्वाचे निर्णय

मुनगंटीवार म्हणाले, पर्यटकांच्या आनंदासाठी तसेच तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रवेशद्वार सुरू करण्यात आले आहे. पावसामुळे ताडोबा येथील गाभा क्षेत्रात प्रवेशबंदी असते. मात्र, बफरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, ही चिंतेची बाब आहे. विधिमंडळ अधिवेशनात एक कायदा येणार असून त्यानुसार वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास तीस दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावीच लागणार आहे.

हेही वाचा – पोलिसांच्या वेतनात वृद्धी पण पदोन्नतीत विषमता कायम! आश्वासित प्रगती योजनेबाबत कर्मचाऱ्यांची नाराजी

जंगलालगतच्या गावांच्या बाजूला दोन किलोमीटरवर कुंपण टाकून वन्यप्राण्यांना गावात येण्यापासून रोखण्याचे नियोजन करता येईल का, यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – चंद्रपूर : वाघाच्या शिकारप्रकरणी बावरिया टोळीचे १६ जण ताब्यात

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाख रुपयांची मदत दिली जात होती. या रकमेत वाढ करून २५ लाख रुपये देण्याचा निर्णय करण्यात येत आहे, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली.

Story img Loader