नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर अनेकांचे प्रेरणास्थान होते. मात्र, ज्यांनी भारतीय विद्यापीठात शिक्षणच घेतले नाही, त्यांना सावरकर यांचा इतिहास काय कळणार, अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली.

मुनगंटीवार एका खासगी कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, राहुल गांधी अंदमान निकोबारच्या काळ्या कोठडीत एक तास काढू शकणार नाही. ज्यांना इतिहास माहीत नसेल अशा लोकांना जनतेने धडा शिकवण्याची गरज आहे.

ex finance minister of j and k haseeb drabu on Article 370
अनुच्छेद ३७० रद्द करून कोणी, काय मिळवले? जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांचा सवाल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
udhhav thackeray
MVA Jode Maro Andolan : “मोदी माफी मागत असताना व्यासपीठावर…”, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर टीका!
RSS in Uttar pradesh
RSS UP: लोकसभेत पेपरफुटीचा भाजपाला फटका; उत्तर प्रदेशमध्ये आता RSS सक्रिय, भरतीप्रक्रियेतील उमेदवारांना मदत
Dharmarao Baba Atram, Ajit Pawar Group, Lok Sabha Elections, Assembly Elections, Maha vikas Aghadi, Ladaki Bahin Yojana, BJP, Private Meetings, Shivaji Maharaj Statue
राष्ट्रवादीचे मंत्री आत्राम म्हणतात “ही माझी शेवटची निवडणूक, यानंतर …”
Minister Dharmarao Baba Atram challenge to Anil Deshmukh Nagpur
अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
hunger strike for Vidarbha, politics Vidarbha,
नेते राजकारणात व्यग्र, विदर्भ राज्यासाठी उपोषणकर्ती रुग्णालयात
Nagpur st employees marathi news
एसटी कामगार पुन्हा रस्त्यावर… कृती समिती काय म्हणते…

हेही वाचा >>> वर्धा: आता हिंदी विद्यापीठातही ‘हनुमान चालिसा’; दोन गटातील वादाने परिसरात तणाव

संभाजी नगरात सभा घेण्यासाठी कुठलाही आक्षेप असता कामा नये. सरकार विरोधात आंदोलन व्हावे, दंगे भडकावे यासाठी सभा होत असेल तर जनतेने महाविकास आघाडीचा खरा चेहरा समजून घ्यावा. शरद पवार म्हणतात सावरकर राष्ट्राचा विषय होऊ शकत नाही. मात्र, सावरकर हा आमचा आस्थेचा विषय आहे, सन्मानाचा विषय आहे. गुजरातमधील अहमदाबादचे नाव सावरकर नगर करा, असे जर शिवसेनेचे नेते म्हणत असतील तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी. जनतेच्या पैशातून एक पेन विकत घ्या. हे नाव बदलले पाहिजे यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे पत्र घ्या आणि नाव बदलण्यासाठी अर्ज करा, अशी उपरोधिक टीका मुनगंटीवार यांनी केली.