नितीन पखाले

यवतमाळ : ऐन गणेशोत्सवात गेल्या ४८ तासांत यवतमाळ जिल्ह्यात बंजारा, आदिवासी व दलित समाजातील पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पोळा, गणेशोत्सव, गौरीपूजन आदी सण आले की, जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांनी समाजमन ढवळून निघते, त्याची दुर्दैवी पुनरावृत्ती यावर्षीही होताना दिसत आहे.

Mohan Yadav striking motorcycle decorated with various things related to Shiv Sena Mumbai print news
शिवसेनेशी संबंधित विविध गोष्टींनी सजलेली लक्षवेधी मोटारसायकल; मोहन यादव यांचा पुण्यातील केसनंद ते दादर प्रवास
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
maharashtra dcm devendra fadnavis praises pune police for investigation in bopdev ghat gang rape case
पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; तपासाबाबत गृहमंत्र्यांकडून पुणे पोलिसांचे कौतुक
trade stop due to the closure of the market committees in West varhad
अकोला: बाजार समित्या बंद! कोट्यवधींचे व्यवहार ठप्प…
Onion and grain trade stopped due to market committee strike nashik
कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
BJP MLA Devrao Holi problems increased during the assembly elections
गडचिरोली: ‘या’ भाजप आमदाराच्या अडचणीत वाढ, काय आहे प्रकरण जाणून घ्या…
Damage to crops due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान; विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
Extra bus service for Saptshrung Fort in navratri 2024
नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात प्रवीण काळे (हिवरी), त्र्यंबक केराम (खडकी), मारोती चव्हाण (शिवणी), गजानन शिंगणे (अर्जुना) आणि तेवीचंद राठोड (बाणगाव) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या नऊ महिन्यांत विदर्भात १ हजार ५८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. गेल्या २५ वर्षांतील ही विक्रमी संख्या असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षीच्या कापूस, सोयाबीनच्या मंदीमुळे तसेच प्रचंड नापिकीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. लागवडीचा खर्च वाढल्यामुळे व बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे या आत्महत्या होत असल्याचा आरोप आहे. कमी मागणी असलेल्या कापूस या मुख्य नगदी पिकामुळे विदर्भाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शाश्वत पीक, डाळी आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. जागतिक हवामानातील बदल हेसुद्धा सध्याच्या कृषी संकटाचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>पैनगंगा नदीत तरुण बुडाला; २२ तासानंतर मृतदेह सापडला

संसदेच्या विशेष सत्रात चर्चेची मागणी

शेतकरी आत्महत्यांना केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा)चे राष्ट्रीय प्रवक्ते व महाराष्ट्राच्या स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. विदर्भात दररोज एकापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना भविष्यात पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा भारताचा दावा फोल आहे. संसदेच्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भाचा दौरा करावा, तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करून विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे.