नागपूर : महाराष्ट्रात आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत. पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून वाघ नखांना महत्त्व दिले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली.

इतिहासतज्ञानी ज्याप्रमाणे वाघनाखाबाबत भूमिका मांडली आहे त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे नागपुरात आल्या असता त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हे देशातील लहान मुलांनासुद्धा माहीत आहे. पक्ष शरद पवार यांनी बांधला आहे. मग चिन्ह इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारी नोकरीमध्ये किती संख्या आहे हे मला माहित नाही. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यांनी त्यावर उत्तर दिले पाहिजे. आकडेवारी जी आली ती कोणी आणली. डेटा हा सरकारकडे असतो. माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्याची माहिती मागवता येईल, मात्र त्याचे उत्तरसुद्धा सरकार देत नसल्याचे सुळे म्हणाल्या.

Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Maharashtra Two Tiger Death, Tiger Death, pench ,
राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…
radhakrishna vikhe patil statement on baramati district creation
बारामती स्वतंत्र जिल्हा निर्मितीची अफवा; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
Tiger-centric tourism prevents tigers from living their private lives peacefully
आर्थिक फायदा होतो म्हणून व्याघ्रपर्यटनाचा तमाशा ?

हेही वाचा – आदिवासींच्या आंदोलनाने गडचिरोली दोन तासांपासून ठप्प, भाजप आमदारांचा सर्वांसमक्ष पाणउतारा…

हेही वाचा – चंद्रपूर : वीज पडून एक ठार, दोघ जखमी; मूल तालुक्यातील चिचाळा येथील घटना

सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप जर कोणी करत असेल तर राज्य व केंद्र सरकार करत आहे. यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, मात्र पक्ष फोड, नेते फोड यातच त्यांचा वेळ जातो, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Story img Loader