वर्धा: पावसाळा म्हणजे रोगांना आमंत्रण असे म्हटल्या जाते. म्हणून मनुष्यांनाच नव्हे तर प्राण्यांनाही बाधा चटकन होते. त्यातही पाळीव प्राण्यांची तर विशेष काळजी क्रमप्राप्त ठरते. उन्हाळा व लगेच पावसाने थंड पडणारे वातावरण पाळीव प्राण्यांना घातक ठरू शकते, असे मत पेट केअर हॉस्पिटलचे डॉ.अनिल चौधरी सांगतात. श्र्वानांमध्ये व्हायरल व्याधी पसरतात. उलटी, पातळ जुलाब व कधी तर रक्ताचे जुलाब होतात. त्यात श्वान दगावत असल्याने लसीकरण करणे आवश्यक ठरते.

नोंदणीकृत पशू वैद्यकीय दवाखान्यात ते करून घ्यावे. त्वचेचे आजार फोफावतात. त्वचा आजार झाल्यास श्वान अस्वस्थ होतो.वास सुटतो. म्हणून त्वचा कोरडी ठेवावी. सारखा ओला होत असल्यास श्वसन विकार बळावतात. कोरडा खोकला व घश्यात काही अडकल्याची भावना असते. त्यावर लस उपलब्ध असते.

ganeshotsav flowers marathi news
निसर्गलिपी: हिरवा निसर्ग हा भवतीने…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
simple tips the car will look like new even in rainy season
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने पावसाळ्यातही कार दिसेल नव्यासारखी
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…
Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल
boiled water during monsoon
Health Special: पावसाळ्यात कढवून आटवलेले पाणीच का प्यावे?

हेही वाचा…. नागपूर ‘एम्स’मध्ये रुग्णांना लुटण्याची नवीन क्लुप्ती, प्रकरण काय?

हवेतून पसरणाऱ्या जंतू मुळे हे श्वसन विकार पाळीव प्राण्यांना होतात.परजीवी पिसू,गोचीड या किड्यापासून रक्त संसर्ग आजार होतात. त्याचा प्रतिबंध करण्यासाठी गोळ्या व त्वचेवर लावण्यास मलम उपलब्ध आहेत.आहारात बदल करू नये. वर्षभर असणारच पावसाळ्यात पण ठेवावा,असे डॉ. चौधरी स्पष्ट करतात. त्वचा कोरडी ठेवावा. पाय व बोटे पुसून काढावी.या दिवसात आपला ‘ टॉमी ‘ सुरक्षित रहावा, असे वाटत असेल तर काळजी घेतलीच पाहिजे, असा सल्ला मिळतो.