लोकसत्ता टीम

यवतमाळ: सामान्य माणूस छोट्याछोट्या वैयक्तिक कारणांसाठी अनेक महत्त्वाच्या दैनंदिन गोष्टी टाळतो. मात्र लग्नासारखा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण येऊन ठेपला असताना मेहंदी लावलेल्या हातांनी एक तरुणी चक्क श्रमदानास पोहचली. हे कुठल्या चित्रपटातील दृश्य नसून यवतमाळ येथे घडलेली घटना आहे.

Supriya sule and jitendra awhad
“भाजपाच्या लाडक्या भावाने स्वतःच्या लाडक्या बहिणीला…”, ‘लाडकी बहिणी योजने’वरून आव्हाडांची अजित पवारांवर टीका
Chandrapur, woman, murder,
चंद्रपूर : धारदार शस्त्राने महिलेचा खून, बाबा आमटेंच्या आनंदवनात पहिल्यांदाच…
Boyfriend Stabs Girlfriend
“…तर आरती यादव वाचली असती”, पोलिसांवर आरोप करत पीडितेच्या आई-बहिणीने फोडला टाहो
Anniss bhondugiri shunyavar campaign in collaboration with Panchvati Police
पंचवटी पोलिसांच्या सहकार्याने अंनिसची ‘भोंदूगिरी शून्यावर’ मोहीम
Assam Home Secretary Shiladitya Chetia commits suicide after wife death
पत्नीच्या मृत्यूनंतर आसामच्या गृहसचिवांची आत्महत्या
Loksatta anvyarth Violent ethnic conflict in Manipur Home Ministership
अन्वयार्थ: एवढा विलंब का लागला?
Devendra FAdnavis on vasai murder case
वसईत तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भक्कम पुराव्यानिशी…”
Asha Sevika are Aggressive strong protests at Azad Maidan for the third day in row
आशा सेविका आक्रमक, सलग तिसऱ्या दिवशी आझाद मैदानात जोरदार निदर्शने

यवतमाळ येथे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने वाघाडी नदी सेवाकार्य सुरू आहे. योग शिक्षिका मीनाक्षी ढोबळे या सेवाकार्यात कायम सहभागी असतात. त्या बालसंस्कार वर्गही चालवितात. शक्य त्या सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. रविवार, ८ मे रोजी त्यांचा विवाह होता. विवाहाच्या दिवशीच हळदी आणि परंपरेनुसारचे कार्यक्रम असताना प्रत्येक रविवारी ठरल्याप्रमाणे सकाळी त्यांनी वाघाडी येथे येऊन श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. अगदी सकाळी साडेसातपासूनच त्यांनी वाघाडी येथे आपले माहेर व सासरच्या कुटुंबियांसह हजेरी लावून प्रत्यक्ष स्वच्छताकार्य केले. पारंपरिक विवाहातील काही कुप्रथा त्यांनी आवर्जून टाळल्या.

हेही वाचा… वाशीममध्ये खासगी बस जळून खाक; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ११ विधवा महिला शेतकऱ्यांच्या हातून बांगड्या भरवून समान स्त्री स्वातंत्राचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. सेवाधर्माचे बाळकडू अंगात भिनले असेल तर श्रमसंस्काराचे मोती आपल्या शब्दातून नव्हे तर कृतीतून दिसतात. मीनाक्षी या सुद्धा स्वतःच्या लग्नाचे कारण देऊ शकल्या असत्या. मात्र त्यांनी ते टाळत सातत्याचा एक आदर्श परिपाठ आपल्या कृतीतून सामाजिक कार्यकर्त्यांना घालून दिला.

हेही वाचा… वर्धा : लक्षावधी रुपयांचा सुगंधी तंबाखू जप्त, पान मसाला व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

लग्नाचा जोडा घालून केवळ औपचारिक श्रमदान नाही, तर अगदी श्रमदानाकरिताचे नियमीत कपडे परिधान करुन ढोबळे आणि खत्री कुटुंब उपस्थित होते. श्रमदानानंतर मीनाक्षी व अभिजित लक्ष्मणलाल खत्री यांनी जोडीने आपल्या विवाहाची साक्ष म्हणून रामफळ आणि सीताफळ असे दोन वृक्ष लावून उपस्थितांचे आर्शीवादही घेतले. सायंकाळी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात मीनाक्षी व अभिजित यांचा विवाह थोरामोठ्यांच्या उपस्थितीत पार पडला. मीनाक्षी यांच्या या कृतीचे सामाजिक क्षेत्रात कौतुक होत आहे.