अमरावती : प्राथमिक शिक्षकांच्‍या ऑनलाईन बदली प्रक्रियेत अनेक शिक्षकांवर झालेल्‍या अन्‍यायाच्‍या निषेधार्थ अन्‍यायग्रस्‍त शिक्षक समन्‍वय समितीच्‍यावतीने गुरूवारी येथील जिल्‍हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्‍यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पाठिंबा दिला आहे.

बदलीपात्र शिक्षकांच्‍या अवघड क्षेत्रात कोणतेही निकष न पाळता बदल्‍या करण्‍यात आल्‍या, या बदल्‍या म्‍हणजे सहावा टप्‍पा रद्द करावा, अशी शिक्षकांची मागणी आहे. दुर्गम भागातील शिक्षकांना बदली प्रक्रियेत केवळ १ जागा उपलब्‍ध आहे. (संवर्ग-३ बदली अधिकार प्राप्‍त शिक्षक). संवर्ग १ मधील शिक्षकांना, सुगम भागातील शिक्षकांना आणि दुर्गम भागातील शिक्षकांना वेगवेगळ्या अटी आहेत. ५३ वर्षांच्‍या वरील शिक्षक, दुर्धर आजार असलेले आणि ज्‍येष्‍ठ महिला शिक्षकांची अतिदुर्गम भागात बदली रद्द करणे, अशाही मागण्‍या आहेत.

education department explained on Examination after recruitment of teachers
शिक्षकांची नियुक्तीनंतर परीक्षा? शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण…
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
dispute between non bjp ruled states and centres over funds allocation under samagra shiksha scheme
अन्वयार्थ : केंद्र-राज्यांत आता शिक्षणाचा वाद
mbmc guidelines for security guards in school
मिरा भाईदर महापालिका शाळेतील सुरक्षा रक्षकांनाही ‘मर्यादा; बदलापूर येथील घटनेनंतर खबरदारी
Patangrao Kadam memorial site will be inaugurated tomorrow print politics news
डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे उद्या लोकार्पण; राहुल गांधी यांची उपस्थिती
book study eduction
शिक्षणाची संधी:  ‘महाज्योती’द्वारे चालवणारे विविध कोर्सेस
Loksatta explained Why is it necessary to classify the work of teachers
विश्लेषण: शैक्षणिक कामे खरोखरच ‘शैक्षणिक’ आहेत?
navi mumbai municipal corporation school decide to Character verification of teachers support staff
शिक्षक, मदतनीसांची चारित्र्य पडताळणी; नवी मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी निर्णय

हेही वाचा >>> गारपीट व मुसळधार पावसाचे थैमान; तीन जनावरे ठार, शेकडो फळबागा उद्ध्वस्त

शासनाच्‍या चुकीच्‍या धोरणामुळे सपाटीवरील शाळांचे भवितव्‍य धोक्‍यात आल्‍याचा आक्षेप शिक्षकांनी घेतला आहे. विषय शिक्षकांची पदस्‍थापना होऊन एक वर्ष देखील होत नाहीर, तर बदली करण्‍यात येते. या टप्‍प्‍यामुळे सुगम भागातील ३०६ शिक्षक दुर्गम भागात स्‍थानांतरीत झाल्‍याने सुगम क्षेत्रातील अनेक शाळा शिक्षकाविना राहणार आहेत. या बदली प्रक्रियेमुळे यापुर्वीही दुर्गम भागात ३ ते १२ वर्षे सेवा देणा-या शिक्षकांचे पुन्‍हा दुर्गम भागात स्‍थानांतर झाले आहे. या बदली प्रक्रियेत अनेक अनियमितता आणि अन्‍याय झाल्‍याने शेवटचा सहावा टप्‍पा रद्द करावा, अशी मागणी आंदोलकर्त्‍या शिक्षकांनी केली आहे.