नागपूर : राज्यात शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यावेळीही निकालाचा टक्का घसरला आहे. ३ लाख १९६२ पैकी केवळ ६४ हजार ८३० परीक्षार्थी सीईटीसाठी पात्र ठरले आहेत.

हेही वाचा – प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित अंत! मित्राच्या बहिणीवर जीव जडला, मग भावानेच मित्राचा काटा काढला…

pune s praveen kamble tops maharera exam 6755 candidates pass in maharashtra
‘रेरा’च्या परीक्षेत पुण्याचा प्रवीण कांबळे प्रथम! राज्यात ६ हजार ७५५ उमेदवार उत्तीर्ण; मुंबईतील ८४ वर्षीय व्यक्तीचेही यश
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
What is the decision of the State Board of Secondary and Higher Secondary Education regarding the directors and supervisors of teachers during examinations Nagpur news
दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर नवीन वाद?….हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर…
maharashtra , CET, students , Applications ,
सीईटीसाठी राज्यभरातून ३ लाख ८० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज, एमबीए, एमएमएस आणि बी.एड अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
New admit cards , 12th exam, State board decision,
बारावीच्या परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्रे, जात प्रवर्गाच्या उल्लेखावरील आक्षेपानंतर राज्य मंडळाचा निर्णय

सध्या सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पुन्हा २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत शिक्षक भरतीसाठी अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षण खात्याने दरवर्षी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरवर्षी टीईटी घेऊन शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात टीईटी घेतली होती. यावेळी टीईटीच्या पहिल्या पेपरला १ लाख ४३ हजार ७२०, तर दुसऱ्या पेपरला १ लाख २७,१३१ परीक्षार्थी बसले होते. मात्र, दरवर्षीप्रमाणे शिक्षक भरतीसाठी पात्र ठरणाऱ्या परीक्षार्थींची संख्या कमी असल्याचे निकालावरून दिसून आले. पहिला पेपर दिलेल्यांपैकी फक्त १४ हजार ९२२, तर दुसरा पेपर दिलेले ४९ हजार ९०८ परीक्षार्थी पास झाले आहेत.

हेही वाचा – बुलढाणा : सिंदखेडराजा, देऊळगाव राजा तालुक्यात अवकाळीचे तांडव! अतिवृष्टीसदृश पावसाने झोडपले; हजारो हेक्टरवरील पिके आडवी

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात १३ हजार ५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना शाळांचे वाटप केल्यानंतर नवीन शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यास सुरुवात झाली आहे.

Story img Loader