अमरावती : संपूर्ण देशात ‘एनसीएपी’ (नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम) अंतर्गत २०२३-२४ या वर्षात घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षणात ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहराने दोनशेपैकी १९४ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच गटात द्वितीय क्रमांक मुरादाबाद आणि तृतीय क्रमांक गुंटूर शहराला प्राप्त झाला आहे.

स्वच्छ हवा सर्वेक्षणात १० लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूरला प्रथम, आग्रा शहराला द्वितीय, तर ठाणे शहराला तृतीय क्रमांक मिळाला आहे. तीन लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये परवानू शहराला प्रथम, काला आंब शहराला द्वितीय, तर अंगूल या शहराला तृतीय क्रमांक मिळाला आहे.

Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
bryan johnson
Bryan Johnson : भारतातील खराब हवेमुळे अमेरिकेच्या इन्फ्लुएन्सरने शुटींग मध्येच थांबवलं; मास्क अन् एअर प्युरिफायर असतानाही आरोग्यावर परिणाम!
PMC News: महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी जाणार इंदूरला हे आहे कारण !
air pollution issue ignore in in delhi assembly elections
‘शुद्ध हवा’ नावडे दिल्लीकरांना…
Health Infectious Diseases Climate Change Health news
आरोग्य: भय इथले संपत नाही…
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती

हेही वाचा – उपराजधानीत ‘स्वाईन फ्लू’चे ५ बळी

स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत हवा शुद्ध ठेवण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने मानांकन जाहीर केले. या संदर्भातील पत्र पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे उप सचिव रवींद्र कुमार तिवारी यांच्याकडून अमरावती महापालिकेला मिळाले आहे. महापालिकेद्वारे ‘एनसीएपी’अंतर्गत आतापर्यंत केलेल्या उत्तम कामगिरीचाच हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी दिली. येत्या ७ सप्टेंबर रोजी पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते भोपाळ येथे अमरावती महापालिकेला हे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. या पुरस्कारामुळे महापालिकेला भविष्यात पर्यावरण संवर्धनासाठी आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही देवीदास पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – सूनेचे डोके भिंतीवर आपटले; सासूविरोधात गुन्हा

पर्यावरण मंत्रालयाद्वारे शहरांना स्वयंमूल्यांकन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. एकूण १३१ शहरांनी अहवाल सादर केले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या अहवालांची तपासणी केली. त्यांनी काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे मानांकन जाहीर करण्यात आले. गेल्यावर्षी तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात अमरावतीने तिसरा क्रमांक पटकावला होता.

Story img Loader