नागपूर : राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असून त्यांच्या नियंत्रणाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद हे समितीचे सदस्य सचिव असतील.

elephants proposed to their partner with Flowers
सोंडेत धरली फुले अन्… हत्तीने त्याच्या पार्टनरला केले असे प्रपोज; पाहा व्हायरल VIDEO
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Emotional video of young girl driving cycle rikshaw for family responsibility viral video on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! तरुण मुलीचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Baby Girl Sharing food with Dad
‘म्हणून लेकीला घरची लक्ष्मी म्हणतात…’ उपाशी बापासाठी चिमुकलीने केलं असं काही की… VIDEO पाहून डोळे पाणावतील
Pune Doctor funny medicine prescription viral on social media
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहिलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar make cold coffee for spardha thigle
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरने नव्या मुक्तासाठी केली ‘ही’ खास गोष्ट, स्वरदा ठिगळे फोटो शेअर करत म्हणाली…
Rasgulla mithai making video unhygienic food shocking video goes viral on social media
तुम्हीही बाजारातून रसगुल्ले आणून खूप आवडीने खाता? दुकानातला हा VIDEO पाहिलात तर मिठाई घेताना शंभर वेळा विचार कराल
Raj Thackeray upset factionalism MNS nashik
मनसेतील गटबाजीने राज ठाकरे नाराज; जिल्हा, शहर कार्यकारिणी बरखास्तीची शक्यता

हेही वाचा – गोंदिया: आमगांव येथील दोन पोलिसांना मारहाण; पाच आरोपींना अटक

दिव्यांग बांधवांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेकजण विभागीय स्तरावर तसेच शासकीय कार्यालयात जाऊन आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत. त्यामुळे शासनानेच दिव्यांगांना आपल्या अडीअडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली आहे, त्यांना विविध योजनांचा लाभ तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाने ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास २९ लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यांग बांधवांना याचा फायदा होणार आहे.

Story img Loader