नागपूर : शासकीय रुग्णालय आजारी झाल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसात निर्दोष लोकांचा जीव जाणाऱ्या घटना राज्यात घडत आहे. शासकीय रुग्णालयात  मृत्यू तांडव थांबवयाचे नाव घेत नाही आणि खाजगी रुग्णालयाकडून लुट सुरू आहे.  काँग्रेसच्या काळात तयार झालेले शासकीय रुग्णालय खराब करण्याचे काम भाजप करत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. शासकीय रुग्णालयात सोयी सुविधा पुरविण्यात सरकारला अपयश आले आहे त्यामुळे रुग्णांवर उपचार होत नाही. रुग्णालयात एजंट नियुक्त केले जात असताना सरकारचा त्यावर नियंत्रण राहिलेले नाही. मेडिकल स्टोरमध्ये जास्त भावाने औषध घेऊन गरिबांना लुटले आहे, पथालॉजीमध्ये सेवा मोफत असताना त्या ऐवजी पैसे घेतले जात आहे. २२०० खाटांचे रुग्णालयाचा विस्तार होणे अपेक्षित होते, पण अजूनही त्याचा विस्तार झाला नाही.

Ganpat Gaikwad wrote letter to Kalyan Dombivli Municipal Commissioner with jail approval
गणपत गायकवाड यांचे तुरुंगातून विकास कामांसाठी कडोंमपा आयुक्तांना पत्र
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Hema Malini
“ती फार मोठी घटना नव्हती”, भाजपा खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर विधान; ३० जणांचा झाला होता मृत्यू
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

हेही वाचा >>> इथे घरकूलकरिता मोजावे लागतात सहा हजार रुपये, नेमका काय आहे प्रकार? वाचा…

राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने मेडिकलसंबंधी कायदा केला. तो कायदा महाराष्ट्रात लागू  करावा. खाजगी रुग्णलयात सर्वाना उपचार मिळेल अशी चांगली सोय करावी मात्र तेथेही रुग्णांची लुट होत असल्यामुळे शासकीय रुग्णालयात रुग्ण जात असतात मात्र तिथेही उपचार मिळत नाही अशी स्थिती आहे. या सरकारची मानसिकता ही लोकांचे मृत्यू होत असताना शांत राहत आनंद घेण्याची आहे का असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. समृद्धीचे उदघाटन केले तेव्हा समृद्धी येईल असे सांगितले आता मात्र भाजपचे बगल बच्चे टोल वसुली करत आहे, लोकांचा मृत्यू होत असताना हे अफलातून उत्तर देत आहे, या सरकारला जनतेचे  देणे घेणे नाही असेही पटोले म्हणाले.

Story img Loader