वर्धा: एक ते बारा ऑगस्टदरम्यान चाहूलही न देणाऱ्या पावसाने गेल्या चार दिवस हजेरी लावली. आता परत आभाळ कोरडेठाक आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यातील हमखास पडणाऱ्या पावसाचा यापूर्वी कसा इतिहास राहिला, हे तपासणे उत्सुकतेचे ठरत आहे.

जाणकार म्हणतात की, हा कदाचित इतिहासातील सर्वात कोरडा ऑगस्ट महिना राहू शकतो. प्राप्त आकडेवारीनुसार, १९१३ मध्ये १८८.८ मिमी, १९२० मध्ये १९२.४, २००५ मध्ये १९०.१ , २००९ मध्ये १९२.५, २०२१ मध्ये १९६.२ मिमी अशी ऑगस्ट महिन्यातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. आता यावर्षी १९ ऑगस्टपर्यंत केवळ १०६.२ मिमी पावसाची नोंद झाली. या महिन्यात सलग बारा दिवस पाऊस न पडण्याची बाब गेल्या १४ वर्षात प्रथमच घडली. पावसाचा या महिन्यातील अनुशेष चाळीस टक्क्यांवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पूर्वी २० ते २५ टक्के उणे सरसरीची नोंद झालेली आहे. अद्याप आठ दिवस बाकी आहेत. मात्र या पुढील कालावधीत पाऊस पडेलच याची शंभर टक्के खात्री जाणकार देत नाही.

Chronology Mathematics of time Republic Day independence day
काळाचे गणित: दिवस क्रमांक २४६०७०७
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
Which festival will be celebrated in February
February Festival 2025: फेब्रुवारी महिन्यात कोणते सण कोणत्या दिवशी साजरे केले जाणार? जाणून घ्या गणेश जयंती, महाशिवरात्री अन् एकादशीची तारीख; पाहा संपूर्ण यादी…
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
makar Sankranti loksatta
काळाचे गणित : करी डळमळ भूमंडळ
importance of republican day marathi
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

हेही वाचा… नोकरीसाठी क्युआर कोडद्वारे पैशाची मागणी; महामेट्रोने केला खुलासा

मुंबई हवामान विभागाचे डॉ.अनुपम कश्यपी म्हणतात की, कालावधीची आकडेवारी सांगता येणार नाही. पण हे निश्चित की, हा ऑगस्ट सर्वात कोरडा ठरणार. यापुढील आठ दिवसात किती व कसा पाऊस पडणार याबाबत आता सांगता येणार नाही. पण पडेल अशी आशा करू या, असे मत डॉ. कश्यपी यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’सोबत बोलताना व्यक्त केले.

Story img Loader