नागपूर : सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे पडसाद शनिवारी राज्यभर उमटले. मराठवाड्यातील आंदोलनाची झळ ‘एसटी’ला बसली. नागपूरहून एसटीने मराठवाड्याला निघालेले बरेच प्रवासी मध्येच अडकून पडले. मराठवाड्याहून नागपुरात एकही बस आली नाही.

मराठा आंदोलनामुळे शनिवारी नागपूर विभागातील एसटीचे तब्बल ३,४०१ किलोमिटर परिचलन रद्द झाले. एसटी महामंडळातील सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूरहून छत्रपती संभाजीनगर, अंबेजोगाई, सोलापूर, पुणेपर्यंत काही बसेस धावतात. त्यापैकी मराठवाड्यात आंदोलन पेटल्याने तेथील पाचपैकी एकही बस नागपुरात परत आली नाही.

Nagpur Police, illegal traders Nagpur,
नागपूर : पोलीस अवैध धंदेवाल्यांच्या संपर्कात! पोलीस कर्मचारीच निघाला….
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
95 percent increase in cost of Versova Bay Madh connecting project ravi raja Mumbai news
वर्सोवा खाडी – मढ यांना जोडणाऱ्या प्रकल्पाच्या खर्चात ९५ टक्क्यांनी वाढ; विरोधी पक्ष नेता रवी राजा यांचा आरोप
badlapur school girl rape case marathi news
बदलापूर: ‘त्या’ माध्यम प्रतिनिधीला जामीन मंजूर, वकील संघटनांचा पुढाकार, अन्य आरोपींनाही जामीन
Ravikant Tupkar, hunger strike,
बुलढाणा : रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; ११ सप्टेंबरला मंत्रालयात बैठक
Bullock carts and horses also on the road in protest against potholes in Nashik
नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधातील आंदोलनात बैलगाडी, घोडेही रस्त्यावर
travelers face difficulties as st workers strike continue
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!
BJP Thackeray group thane,
ठाण्यात भाजप, ठाकरे गटाचा संयुक्त मोर्चा ? कोलशेतमध्ये स्थानिकांच्या रोजगारासाठी ग्रामस्थांनी काढला मोर्चा

हेही वाचा >>>एसटीचे ४५ आगार पूर्णत: बंद; मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ ‘या’ जिल्ह्याला…

नागपूरहून छत्रपती संभाजीनगर येथे निघालेली बस वाशीमला पोहचल्यावर रद्द झाली. अंबेजोगाईला निघालेली बस पुसदला रद्द झाली. छत्रपती संभाजीनगरला निघालेली एक बस कारंजा लाड येथे तर दुसरी बस चिखली येथे रद्द झाली. त्यामुळे नागपूरहून मराठवाड्याच्या दिशेला निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप झाला. तुर्तास नागपूर विभागातील आगारांतून मराठवाड्यातील फेऱ्या वगळता इतर भागातील परिचलनावर काहीही परिणाम झाला नाही, हे विशेष.