नागपूर : जी-२० शिखर परिषदेदरम्यान राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या रात्रीभोज निमंत्रण पत्रावरून वाद सुरू झाला आहे. यात ‘भारताचे राष्ट्रपती’ असा उल्लेख आहे. त्यावरून आता वादंग निर्माण झाला असून देशाचे नाव आता अधिकृतरित्या ‘इंडिया’ असे केले जाणार का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चार दिवसांपूर्वी गुवाहाटी येथे केलेले वक्तव्य आता चर्चेत येत आहे.

डॉ. मोहन भागवत यांनी गुवाहाटी येथे सकल जैन समाजच्या एका कार्यक्रमात बोलताना  ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ या नावाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले, या देशाचे नाव अनेक शतकापांसून भारत आहे, इंडिया नाही. त्यामुळे आपल्याला जुन्या नावाचा उपयोग करायला हवा.  आपल्या देशाचे नाव शतकांपासून  भारत आहे. भाषा कोणतीही असू द्या, नाव एकच असते. आपला देश भारत आहे आणि आम्हाला सर्व व्यवहारत इंडिया शब्द वापरणे बंद करून भारत शब्द उपयोगात आणणे सुरू करायला हवे. आम्हाला आमच्या देशाला भारत म्हणायला हवे आणि दुसऱ्यांना देखील हे समजावून सांगयला हवे, असे भागवत म्हणाले होते.त्यानंतर चार दिवसांनी जी-२० रात्रीभोज निमंत्रण पत्रात “प्रेसिझेंड ऑफ इंडिया” च्या ऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे नमूद करण्यात आले आहे.

External Affairs Minister S Jaishankar reprimanded Pakistan China on terrorism
इस्लामाबादमधून भारताचे पाकिस्तान, चीनला खडेबोल; दहशतवाद, सार्वभौमत्व, शेजारधर्मावरून परराष्ट्रमंत्र्यांची टोलेबाजी
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
s jaishankar meets pakistan pm shehbaz sharif
Video: अवघ्या २० सेकंदांची भेट, जुजबी चर्चा आणि भेट संपली; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी अत्यल्प चर्चा!
baba siddique firing
Who killed Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे ‘या’ गँगचा हात; आरोपींनी दिली धक्कादायक माहिती
Raj Thackeray
Raj Thackeray : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “गेली ९९ वर्ष संघाने…”
India ASEAN countries
एकविसावे शतक भारत, ‘आसियान’चे, भारत-आसियान शिखर परिषदेत मोदींचे उद्गार
eknath shinde bjp victory in haryana
Eknath Shinde : “हरियाणाप्रमाणेच आता महाराष्ट्रातील जनताही काँग्रेसच्या…”; भाजपाच्या विजयानंतर नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
Narendra Modi On Muizzu India Visit
Mohammad Muizzu India Visit : “भारत मालदीवचा सर्वात जवळचा मित्र”, मोहम्मद मुइज्जू यांच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींचं विधान