बुलढाणा: कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्याची खरीप हंगामाची दुसऱ्या टप्प्यातील अर्थात सुधारित पैसेवारी संभाव्य दुष्काळ दर्शविणारी आहे. त्यामुळे सध्या दोन तालुके दुष्काळ ग्रस्त म्हणून घोषित झाली असली तरी अंतिम पैसेवारीत तालुक्यांची संख्या जास्त राहण्याची दाट शक्यता आहे.

यंदाच्या खरीप हंगामात ७.४० लाख हेक्टरवर खरीप पिकांचा पेरा करण्यात आला होता. अपुऱ्या व अनियमित पावसाने पिकांची वाढ व नंतर उत्पादनात लक्षणीय घट झाली. सप्टेंबर मध्ये घोषित झालेल्या नजर अंदाज पैसेवारीत या गंभीर स्थितीचे प्रतिबिंब उमटले नाही. मात्र ऑक्टोबर अखेरीस जाहीर झालेल्या सुधारीत पैसेवारीत मात्र याची चिन्हे दिसून आली.

parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
More than 17 deaths in two years at ammunition company
दारुगोळा कंपनीत दोन वर्षांत १७ हून अधिक बळी… भंडारातील घटनेमुळे…
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
pune tomato prices fall
टोमॅटोचे भाव घसरले, शेतकरी हवालदिल

हेही वाचा… तीन डॉक्टर ठरले “दिव्यांगी” साठी देवदूत; जहाल मण्यार सापाचे मुलीच्या अंगात पसरलेले विष यशस्वीरित्या बाहेर काढले

अलीकडेच दुष्काळ जाहीर झालेल्या लोणार तालुक्याची पैसेवारी केवळ ४८ इतकी तर बुलढाण्याची ५३ पैसे निघाली आहे. मेहकर तालुक्याचा(६१ पैसे) अपवाद वगळता उर्वरित १२ तालुक्यांची पैसेवारी ५६ च्या खालीच आहे. चिखली ५२, देऊळगाव राजा ५५, मलकापूर ५४ , मोताळा , नांदुरा, खामगाव ,शेगाव या तालुक्यांची प्रत्येकी ५६ पैसे, जळगाव ५५ तर संग्रामपूर ५४ अशी इतर तालुक्यांची पैसेवारी आहे.

पिकनिहाय स्थिती

दरम्यान जिल्ह्यातील तीन मुख्य पिकांची पैसेवारी अर्थात स्थिती गंभीर म्हणावी अशीच आहे. तब्बल ४,२०,२६५ हेक्टरवर पेरा झालेल्या सोयाबिन ची १,८०, २१२ हेक्टरवर असलेल्या कपाशीची ५६ तर दहा हजार हेक्टरवर असलेल्या मक्याची पैसेवारी ५४ निघाली आहे. यामुळे या तिघा पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट येणार हे उघड आहे. यंदा काढणी झालेल्या सोयाबिन चे एकरी उत्पादन ५ ते ६ क्विंटल इतकेच आले आहे.

Story img Loader