नागपूर: राज्यातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी राज्य महिला आयोगाने ‘मिशन ई सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला असून गुरूवारी १४ डिसेंबरला वनामती सभागृहात आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाची सुरूवात होणार आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विविध महाविद्यालयातील ५०० विद्यार्थी यात सहभागी होणार असून मेटाचे तज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Five times increase in admission fee in private AYUSH colleges
खासगी आयुष महाविद्यालयांमधील प्रवेश शुल्कात पाच पट वाढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Nair Hospital case Associate professor suspended for sexual harassment of medical student
नायर रुग्णालय प्रकरण : वैद्यकीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाप्रकरणी सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन
Maharashtra Medical Council, Maharashtra Medical Council Introduces QR Codes, Combat Bogus Doctors, combat bogus doctors new technology of QR Codes, marathi news, Maharashtra news, doctors, loksatta news,
नागपूर: आरोग्य विद्यापीठाकडून डॉक्टरांना कौशल्य विकासासाठी ‘डीएचएफसी’सक्ती
Teachers Day Special Students become teachers of students Where is this unique school
शिक्षक दिन विशेष : विद्यार्थीच झाले विद्यार्थ्यांचे शिक्षक… कुठे आहे ही अनोखी शाळा?
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
mbbs students will now also have to study moral values education
एमबीबीसच्या विद्यार्थ्यांना आता ‘याचा’ही अभ्यास करावा लागणार, मिळणार विशेष गुण
Nagpur, Music Teacher, nagpur school teacher beating srudent, Student Beating, Complaint, Education Officer, Deputy Chief Minister, School Education Minister,
शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, कायदा काय सांगतो?

सध्या इंटरनेट हे दुधारी अस्त्र आहे. त्याचे अनेक फायदे असले तरी काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे मोठ्या प्रमाणात यात फसवणूकही होत आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार टाळण्याकरिता तसेच भविष्यात सायबर सुरक्षित होण्याकरिता ‘मिशन ई सुरक्षा’ राबवण्यात येणार आहे. मुलींनी सायबर सुरक्षित होण्याकरिता घ्यावयाची काळजी, कायद्यातील तरतूदी, यंत्रणांची मदत याबाबत या कार्यक्रमात माहिती देण्यात येणार आहे.

हेही वाचा… ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या प्रयोगाने देशमुखांचा फडणवीस यांच्यावर हल्ला

उपक्रमाबाबत बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, महाविद्यालयीन मुली सायबर फसवणुकीला बळी पडल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे राज्यभरातून येत असतात. कुठे दाद मागावी हे न कळल्याने मुली याबाबत वाच्यता करीत नाही. अशा प्रसंगात कोणती काळजी काळजी घ्यावी, मदतीसाठी कुठे संपर्क साधावा याबाबतची माहिती मुलींपर्यंत पोहोचावी यासाठी आयोगाने ‘मिशन ई-सुरक्षा’ उपक्रम हाती घेतला आहे.