लोकसत्ता टीम

गोंदिया: अर्जुनी मोरगाव, नगरपंचायत आणि तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या अर्जुनी येथे भरणारा आठवडी बाजार चिखलाच्या साम्राज्यात भरतो आहे. केवळ कमिशन खोरीच्या नादात असणारे येथील पदाधिकारी आणि अधिकारी यांना याचा काहीच सोयर सुतक नाही.

child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
buldhana lonar lake marathi news
Video: लोणार सरोवरावर धुक्याची चादर
nar madi waterfall in the historical Naladurg Bhuikot Fort is start
ऐतिहासिक नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील नर-मादी धबधबा सुरु
maharashtra chances of heavy rain marathi news
Maharashtra Rain News: राज्यभरात मेघगर्जनेसह कोसळधारा जाणून घ्या, राज्यभरातील पावसाची स्थिती आणि इशारे
tiger near Yavatmal town, tiger, Yavatmal,
सावधान ! यवतमाळ शहराजवळ पट्टेदार वाघ फिरतोय
Ratnagiri, stealing mobile shop Nate,
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाटे येथील मोबाईल शॉपीत चोरी आणि घरफोड्या करणाऱ्या चौघांना मुद्देमालासह अटक
young man visiting Srikshetra Olandeshwar swept away in Panganga River found dead after 20 hours
बुलढाणा : महादेवाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण पैनगंगेत बुडाला; तब्बल २० तासांनंतर…

२०१५ ला या ग्रामपंचायतचे नगर पंचायत मध्ये रूपांतर झाले. नगर पंचायतचा थेट राज्य शासनाची संपर्क येतो. भरपूर प्रमाणात नगरपंचायतींना निधी मिळतो. तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेले अर्जुनी शहर विकासाच्या प्रतीक्षेत होते.नगरपंचायत झाल्याने शहराचा कायापालट होईल अशी आशा नागरिकांना होती. आठ वर्षे लोटली मात्र नागरिकांचा भ्रमनिरास सुरू आहे. ही नगरपंचायत सध्या आठवडी बाजारातील चिखलाच्या साम्राज्याने चर्चेचा विषय झाली आहे. शहराचा विकासात्मक सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून नागरिकांना उत्तम सुविधा देणे नगरपंचायतचे कर्तव्य , मात्र दर शनिवारला भरणारा आठवडी बाजार पायाभूत सुविधांच्या अभावी भरवीला जातो.

आणखी वाचा-वंदे भारत एक्सप्रेसला अचानक प्रतिसाद वाढला, जाणून घ्या कारण…

अर्जुनी शहराच्या मध्यभागी बाजारवाडीची नियोजित जागा उपलब्ध आहे.मात्र या नियोजित जागेवर धनदांडग्याणी कायमस्वरूपी अतिक्रमण करून बाजार वाडीची जागा घशात घातली आहे. नगरपंचायतच्या मालकीची जागा असूनही महसूल विभागाच्या हेलिपॅड मैदानावर बाजार भरविला जातो. पावसाळ्यात या मैदानावर चिखलाचे साम्राज्य आहे. नागरिकांना चिखलातून मार्ग काढीत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी लागते. दरम्यान कधीही चिखलात घसरून पडण्याची भीती ग्राहकांना असते. मजबुरी पोटी दुकानदार आणि ग्राहक नगरपंचायतच्या गलथान कारभाराचा मुका मार सहन करीत आहेत.या परिसरात आता तर चिखलासह घाणीचे साम्राज्य ही निर्माण झाले आहे. बाजारवाडीचे ठिकाणी स्वच्छतागृह,पिण्याचे पाणी आणि पथदिव्यांचा अभाव आहे.

आणखी वाचा-वर्धा: कारवाईचा बडगा! अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता काढली

नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची असते. मात्र बाजार लिलाव करून मोकळे होणे एवढीच जबाबदारी नगरपंचायत बजावत आहे. नगरपंचायतींना शासनाकडून भरपूर निधी मिळते असा नागरिकांचा समज आहे.