नागपूर: राज्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्याने कोकण विभागाला रेड अलर्ट दिला आहे. येत्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची माहिती भारतीय हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. राज्यामध्ये अजूनही ३० टक्के पावसाची तूट आहे.

जुलैमधील पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने गुरुवारी ६ जुलैला जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ७ ते १३ जुलै, १४ जुलै ते २० जुलै, २१ जुलै ते २७ जुलै या काळात कोकणामध्ये चांगला पाऊस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ७ ते १३ जुलै या आठवड्यात मध्य महाराष्ट्रामध्ये तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस अनुभवता येईल. मात्र १४ ते २० जुलै या कालावधीत बहुतांश महाराष्ट्रात फारसा पाऊस नसेल असे आत्ताच्या पूर्वानुमानावरून स्पष्ट होत आहे. २१ ते २७ जुलैच्या आठवड्यात मात्र पूर्ण राज्यात पावसाचे अस्तित्व असू शकेल. त्यानंतर २८ जुलै ते ३ ऑगस्ट या आठवड्यात पुन्हा पावसाचे प्रमाण खालावण्याची शक्यता आहे.

monsoon has been satisfactory across the country in 2024 Maharashtra also received 26 percent more rain than average
देशभरात यंदाचा पावसाळा ठरला समाधानकारक… महाराष्ट्रातही भरपूर पाऊस… एल निनो, ला निना निष्क्रिय?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
nashik goon killed by six marathi news
नाशिक: पूर्ववैमनस्यातून गुंडाची हत्या, सहा जण ताब्यात
Nashik district receives 92 pc of annual rain till date
Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस
maharasthra ganesh visarjan deaths marathi news
विसर्जनादरम्यान राज्यात २१ जणांचा मृत्यू
indian meteorological department predicts heavy rains in maharashtra
Maharashtra Weather Update: महत्वाची कामे हाती घेताय….? पण, मुसळधार पाऊस पुन्हा…..
International Microorganism Day Marathwada and Maharashtra need to get rid of harmful chemical farming
आता मराठवाड्यासह महाराष्ट्रात शेतीसाठी ‘जैविक संग्राम’ हवा!
House collapse in dangerous Kazigadi area along Godavari in Nashik nashik
नाशिकमध्ये धोकादायक काझीगढीत घरांची पडझड; सुमारे १०० रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर