लोकसत्ता टीम

वर्धा : भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची हिंगणघाट येथे सभा झाली. यावेळी त्यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी मला सूचित करून या, असे आवाहन करीत टाळ्या घेतल्या.

rto workers association to go on indefinite strike from september 24 after talks with transport commissioner fail
परिवहन आयुक्तांशी आरटीओ संघटनेची चर्चा निष्‍फळ; २४ सप्टेंबरपासून बेमुदत संप अटळ
dcm devendra fadnavis share opinion on protest for reservation with media
“आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार; पण हिंसा, तेढ…” उपमुख्यमंत्री…
sakoli constituency
Sakoli Constituency : साकोली मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गड राखणार? की भाजपा बाजी मारणार?
vanchit bahujan aghadi released first list of its 11 candidates for upcoming assembly election
भाजप, काँग्रेसला मागे टाकत वंचितची ‘आघाडी’; तब्बल ११ जागांवर केली उमेदवारांची घोषणा
7 year old boy killed in leopard attack in durgapur area of chandrapur
बाप रे…पहिल्या वर्गातील मुलाला बिबट्याने दातात धरले  आणि…
farmer leader raju shetty slam bjp over corruption issues in buldhana
राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….
government buying cotton soybeans now at higher than msp says dcm devendra fadnavis
कापूस, सोयाबीनची खरेदी आता हमीभावापेक्षा अधिक दराने; स्वत: उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या साक्षीने…
gold rate for 24 carats increase by rs 1200 per 10 grams on 21 september
Gold Rate Today In Nagpur : सोन्याच्या दरात मोठे बदल; सराफा बाजार उघडताच…
Ubt leader Kishori pednekar meet rape victim in nagpur
नागपूर हादरले… आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; नराधमास अटक

ते म्हणाले की स्वातंत्र्यानंतर हे पहिलीच अशी निवडणूक आहे जिचा निकाल मतदानापूर्वीच देशाला कळला आहे. येणार तर मोदीच, असे ठरले आहे. भारत देशाला जागतिक शक्ती करण्याचा विडा मोदींनी उचलला आहे. देश विकासाच्या एक नव्या पर्वावार उभा आहे. मोफत राशन, आयुष्यमान योजना, शेतकऱ्यांना अन्नदाता सन्मान,उज्ज्वल भारत योजना, विश्वकर्मा योजना, स्टार्ट अप आणि अन्य योजणांचा लाभ कोट्यावधी जनता घेत आहे. गरिबांनाच घरकुल मिळाले नाही तर रामलल्लाही भव्य निवासस्थान मिळाले. हे सर्व मोदींमुळे झाले. आज देशात उत्तर प्रदेश सुरक्षित आहे. येथे संतांची हत्या होते. मात्र आमच्या राज्यात जर अशी घटना घडली तर ‘उल्टा टांग देते.’

आणखी वाचा-यवतमाळात शिवसेना विरूद्ध शिवसेनाच! १७ उमेदवार रिंगणात

ते पुढए म्हणाले, सात वर्षात संचारबंदी लागली नाही. एकाही दंगल झाली नाही. सर्व यात्रा शांततेत निघतात. पाचशे वर्षानंतर रामलल्ला होळी खेळले. तसेच सीमेवर आता गडबड दिसत नाही. फटाका फुटला तरी पाकिस्तान म्हणते आम्ही फोडला नाही. तीन तलाक प्रथा बंद झाली. काँग्रेस हे करू शकली नाही. मोदींनी केले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले. शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य ते हेच आहे. आता चारसो पारचे लक्ष्य पूर्ण करायचे असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून द्या. इथे रामदास तडस यांनी खूप कामे केली आहेत. म्हणून त्यांना निवडून द्या. प्रत्येकाने स्वतःला रामदास समजून प्रचार करा. घरोघरी जा. निवडून आणा. असे आवाहन योगी यांनी केले.

सुबोध मोहितेंची पत्रकारांवर टीका

मुख्यमंत्री योगी येण्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुबोध मोहिते यांनी केलेल्या वक्तव्याने गोंधळ उडाला. मेडिकल कॉलेज संदर्भात बोलताना ते म्हणाले की, पत्रकार आमदारांकडून पाकिटे घेऊन बातम्या छापतात. त्यामुळे उपस्थित पत्रकार संतापले. पाकिटे घेऊन बातम्या छापणाऱ्या पत्रकारांची नावे सांगा, असा जाहीर संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच निषेध करीत सर्व पत्रकार निघून गेले. दरम्यान, मोहिते यांनी पत्रकारांची माफी मागितली.